तुळजापुरात ‘अभाविप’चे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST2021-07-07T04:39:58+5:302021-07-07T04:39:58+5:30
आराेप - लाेणकरच्या मृत्यूला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार उस्मानाबाद - राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळेच उच्चशिक्षित स्वप्नील लाेणकरने टाेकाचे पाऊल उचलून आपली ...

तुळजापुरात ‘अभाविप’चे आंदाेलन
आराेप - लाेणकरच्या मृत्यूला सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार
उस्मानाबाद - राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळेच उच्चशिक्षित स्वप्नील लाेणकरने टाेकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली, असा आराेप करीत तुळजापुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात पदाधिकारी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
सरकारच्या नाकर्तेपणामुळेच तब्बल दाेन वर्षे परीक्षा हाेऊ शकल्या नाहीत. काही महिन्यांपूर्वीच ‘एपीएससी’च्या अनुषंगाने आंदाेलने झाली हाेती. परंतु, यानंतरही काहीच फरक पडला नाही. त्यामुळे आजही अनेक उच्चशिक्षित पात्र ठरलेले तरुण नियुक्तीपासून वंचित आहेत. दरम्यान, या घटनेचा निषेध नाेंदवित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने मंगळवारी तुळजापूर शहरामध्ये आंदाेलन करण्यात आले. यावेळी स्वप्नील लाेणकरला श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. यानंतरही शासनाने ठाेस पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा अभाविपचे तुळजापूर शहरमंत्री साैरभ कदम यांनी दिला.
यावेळी सहमंत्री गौरव जेवळीकर, दिव्या शिरसागर दयानंद शिंदे, ऐश्वर्या हलकुडे, शुभम काळे, शुभम काळे, प्रतीक आंबुरे, रोहित लबडे, रूपेश शिंदे, धीरज देशमुख, पृथ्वीराज कदम, जिल्हा संघटनमंत्री गंगाधर कोलमवार आदी उपस्थित हाेते.