शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:20 IST

शासनाने दुष्काळ जाहीर केला़ परंतु अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप

उस्मानाबाद : शासनाने दुष्काळ जाहीर केला़ परंतु अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह इतर मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे़ परंतु दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे अंमलबजावणी केली जात नाही़ प्रशासन दुष्काळी उपाय योजनांबाबत गंभीर नसून, दुष्काळी योजना फक्त कागदावरच राबविल्या जात आहेत़ शासनाच्या उदासीन धोरणामुळे चार वर्षात ११ हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत़ सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, पूर्णवेळ कृषी मंत्री नियुक्त करावेत, शासन निर्णयानुसार सर्व कामकाज मराठीत व्हावे, रोहयो, मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर द्यावी, ग्रामस्थांना गावातच रोजगार द्यावा, टंचाई असणाऱ्या गावात टँकर सुरु करावेत, पशुंसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या़ आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, प्रशांत नवगिरे, आबासाहेब ढवळे, उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, महिलाआघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, दिनेश देशमुख, शब्बीर शेख, दादा कांबळे, मिलिंद चांडगे, दत्ता बोंदर, राहुल बचाटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़

टॅग्स :MNSमनसेagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद