शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 19:20 IST

शासनाने दुष्काळ जाहीर केला़ परंतु अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप

उस्मानाबाद : शासनाने दुष्काळ जाहीर केला़ परंतु अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ शेतकरी आत्महत्या रोखण्याकरिता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, यासह इतर मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या. 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे़ परंतु दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ प्रमाणे अंमलबजावणी केली जात नाही़ प्रशासन दुष्काळी उपाय योजनांबाबत गंभीर नसून, दुष्काळी योजना फक्त कागदावरच राबविल्या जात आहेत़ शासनाच्या उदासीन धोरणामुळे चार वर्षात ११ हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत़ सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, पूर्णवेळ कृषी मंत्री नियुक्त करावेत, शासन निर्णयानुसार सर्व कामकाज मराठीत व्हावे, रोहयो, मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर द्यावी, ग्रामस्थांना गावातच रोजगार द्यावा, टंचाई असणाऱ्या गावात टँकर सुरु करावेत, पशुंसाठी चारा उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या़ आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट, प्रशांत नवगिरे, आबासाहेब ढवळे, उपजिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, महिलाआघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली गायकवाड, दिनेश देशमुख, शब्बीर शेख, दादा कांबळे, मिलिंद चांडगे, दत्ता बोंदर, राहुल बचाटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती़

टॅग्स :MNSमनसेagitationआंदोलनOsmanabadउस्मानाबाद