शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:51 IST

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला.

धाराशिव : पाकिस्तानातून भारतात ड्रग्जची तस्करी होत असल्याचे एका कारवाईतून उघड झाले. गुजरातमध्ये ८९० कोटींचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्यातील कृष्णा सानप व दत्ता आंधळे हे दोन आरोपी वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत.  मुंडे हेच मेन आका असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी धाराशिवच्या आक्रोश मोर्चातून केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला. आमदार धस म्हणाले, तुमच्या खंडणीआड आल्याने हत्या केली. तत्पूर्वी, खंडणीची तक्रार घेऊ नका म्हणून पोलिसांना आकाने फोन केले.

आकालाही (वाल्मीक कराड) मोक्का लागला पाहिजे. त्याने बीडच्या महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून १० लाख खर्च करून ५ कोटी सरकारी तिजोरीतून काढून खिशात घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा दुरान्वयेही संबंध नाही, असे म्हटल्याचे सांगत मुंडे दिवसा माणसे मारत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढा. तुमचे वागणे बरे नाही, असे धस म्हणाले.

मानवाधिकार आयोगात गुन्हाकेज : सरपंच हत्येप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात गुन्हाही नोंद झाला. खासदार बजरंग सोनवणे यांनी ३ जानेवारीला आयोगात तक्रार दिली.

आई तुळजाभवानी तूच न्याय दे : वैभवीसरपंच देशमुख यांची कन्या वैभवी म्हणाली, माझ्या वडिलांची हत्या होऊन महिना झाला. अजून न्याय मिळत नाही. आई तुळजाभवानी तूच न्याय दे. दुष्टांचा संहार कर. तर, खून व खंडणीतील आरोपी एकच आहेत. सर्वांवर मोक्का लावा, अन्यथा आम्ही हे राज्य बंद पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

वाल्मीकच्या मुलासह तिघांविरुद्ध तक्रारसोलापूर : परळी येथे राहत असताना आपले दोन बल्कर ट्रक, दोन कार व जागा अनिल मुंडे याच्या नावावर वाल्मीक कराड यांचा मुलगा सुशील याने बळजबरीने खरेदी केल्याची तक्रार सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाली.

८ आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली. पण खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला मोकळे कसे ठेवले, कराडने व्हिडीओ कॉलवर देशमुख यांची हत्या पाहिली आहे. वाल्मीक कराडला कोण वाचवत आहे?     - अंजली दमानिया,     सामाजिक कार्यकर्त्या

हे प्रकरण राजकीय भूमिका घेण्यापेक्षा संवेदनशील पद्धतीने हाताळले असते तर बरे झाले असते. आ. सुरेश धस यांनी या घटनेची ज्या पद्धतीने मांडणी केली, त्यामुळे बीड बदनाम झाले. बीडचे लोक स्वाभिमानी आहेत.     - पंकजा मुंडे, मंत्री,     पर्यावरण आणि पशुसंवर्धन

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडेwalmik karadवाल्मीक कराडdharashivधाराशिवBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण