शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

दुष्काळात 'माणुसकीची पेरणी', 12 वीच्या मुलींसाठी मोफत शिकवणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 12:54 IST

कँटीनमध्ये चहा पीताना काही शिक्षकांशी झालेल्या चर्चेतून मुलींच्या क्लासेससंदर्भात महत्वाची बाब निरीक्षणात आली.

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब येथील पत्रकार आणि शिक्षकांनी एकत्र येऊन प्रेरणादायी उपक्रमाची पेरणी केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थींनींसाठी मोफत क्लासेस सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम येथील शिक्षक आणि पत्रकार मंडळींनी सुरू केलंय. या कामी त्यांना गिताई प्रतिष्ठान (माळी नगर) यांची मोलाची साथ मिळाली. सध्या या मोफत क्लासेसचा लाभ 30 ते 35 मुलींना होत असून 5 शिक्षकांकडून विद्यादानाचं काम होत आहे.

क्लासेसच्या नावाखाली एकीकडे गरीब पालकांना आणि विद्यार्थ्यांची मोठा प्रमाणात लुट करण्यात येत आहे. शिकवणीसाठी भरमसाठ फी घेऊन घेऊन शिकांकडून लुबाडणूक करण्यात येत असतानाच कळंब तालुक्यात मुलींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कँटीनमध्ये चहा पीताना काही शिक्षकांशी झालेल्या चर्चेतून मुलींच्या क्लासेससंदर्भात महत्वाची बाब निरीक्षणात आली. दुष्काळी परिस्थीतीमुळे शेतकरी अन् गरिबांच्या मुलांना क्लासेसपासून वंचित राहावं लागत असल्याचं निदर्शनास आल्यानं हा उपक्रम सुरू केल्याचं पत्रकार शशिकांत घोंगडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. गिताई प्रतिष्ठान व कळंब तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्ताने 12 वी च्या विविध शाखेतील मुलींचे मोफत क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. यंदाच्या हंगामात 20 टक्केही उत्पन्न मिळालं नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होताना दिसून येतो. तर अनेक मुलीचे विद्यालयीन शिक्षणही बंद होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील मुलींसाठी हे मोफत क्लासेस सुरू केल्याचं घोंगडे यांनी सांगितले. 

बारावी विज्ञान शाखेच्या मुलींना सध्या वर्षभर क्लासेसकरीता 25,000 ते 30,000 रुपये लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना क्लासेस लावणे ही दूरची बाब बनली आहे. या गोष्टीचा विचार करून आणि गिताई प्रतिष्ठान व कळंब तालुका पत्रकार संघ यांनी पुढाकर घेत 12 वी च्या मुलींना एक वर्ष मोफत क्लासेस चालू केले आहेत. हे क्लासेस यु व्ही सायन्स अॅकेडमी व ज्ञानज्योती क्लासेस (मार्केट यार्ड) येथे सुरू करण्यात आले आहेत. या शिकवणी वर्गात 5 शिक्षक विद्यादानाचे मोफत काम करत असून सायन्स, आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थीनी येथे शिक्षण घेत आहेत. सध्या 30-35 मुली येथील मोफत शिकवणी वर्गाचा लाभ घेत आहेत.  यंदाच्या वर्षीपासून हे मोफत क्लासेस सुरू करण्यात आले असून 10 दिवसांपूर्वीच क्सासेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच गावातील विश्वजीत ठोंबरे आणि डॉ. रमेश जाधवर यांनी 10 हजार रुपयांचे रजिस्टर या गरीब, गरजू आण होतकरू विद्यार्थीनींसाठी वाटप केले. कळंबसारख्या तालुक्यास्तरावरील शिक्षक आणि पत्रकारांचा प्रेरणादायी विचार इतरही तालुक्यातील विचारवंत नागरिकांनी आत्मसात केल्यास अनेक तालुकास्तरावर ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा भार हलका होईल. 

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdroughtदुष्काळEducationशिक्षणJournalistपत्रकार