शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सोमवारपासून राज्यातील दूध संकलन बंद; मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही : रविकांत तूपकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 18:42 IST

अल्प दरामुळे दूध उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे़ कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी १६ जुलै पासून दूध संकलन बंद करण्यात येणार आहे़

उस्मानाबाद : अल्प दरामुळे दूध उत्पादक शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे़ कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी १६ जुलै पासून दूध संकलन बंद करण्यात येणार आहे़ ‘शिव छत्रपतींचा आशीर्वाद अन् भाजपावाल्यांच्या कंबरड्यात घालू लाथ’ ही घोषणा देत आंदोलन उभे केले जाणार असून, मागणी मान्य झाल्याशिवाय थांबणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितले़

दूध दरवाढ, दुधाला प्रतीलिटर अनुदान या मागणीसंदर्भात  सुरू करण्यात येत असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी उस्मानाबादेतील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दुधाला दरवाढ द्यावी, शेतकऱ्यांना प्रती लिटर पाच रूपये अनुदान द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे केली होती़ मात्र, सरकारने आम्हाला गावरान गाई पाळण्याचा सल्ला दिला आहे़ सोयाबीन, कापसासह इतर शेत मालाला हमीभाव नाही़ आर्थिक अडचणीत आलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे़ हीच अवस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे़ त्यामुळे दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी १६ जुलै पासून राज्यातील दूध संकलन बंद केले जाणार आहे़

आमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी घाई-गडबडीने शासनाने निर्यात होणारी दूध पावडर व दुधाला अनुदान दिले आहे़ देशातून दुधाची व पावडरची निर्यात अल्प प्रमाणात होत असून, याचा फायदा मोजक्याच संस्थांना होणार आहे़ दीड पट हमीभावाची घोषणाही फसवी असून, शासनाने प्रत्यक्षात बांधावर होणारा उत्पादन खर्च ग्राह्य धरून हमी भाव दीड पट द्यावा, अशी मागणी तूपकर यांनी केली़ आमच्या आंदोलनात फूट पडावी यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे़ पोलीस बंदोबस्तात दुधाचे संकलन करण्याची भाषा केली जात आहे़ त्यामुळे प्रसंगी कायदा हातात घेऊ पण आंदोलनाची तीव्रता कमी होऊ देणार नाही़

मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरातील दूध पुरवठाही रोखला जाणार आहे़ आंदोलन मोडण्याची तयारी करणाऱ्या शासनाला त्यांची जागा दाखवून देऊ़ जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती लिटर पाच रूपये अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल, असेही तूपकर म्हणाले़ यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, कार्याध्यक्ष गोरख भोरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, महिला आघाडीच्या सोनाली शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले आदी उपस्थित होते़

परराज्याती दूध रोखण्यासाठी फौजाराज्यात प्रती दिन ९७ लाख लिटर दुधाची मागणी असून, उत्पादन १ कोटी ३४ लाख आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे़ राज्यातील दूध शिल्लक राहत असताना गुजरात मधून ३८ लाख लिटर, मध्यप्रदेश व केरळमधून प्रत्येकी दीड लाख लिटर दूध राज्यात येत आहे़ परराज्यातून येणारे दूध रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फौजा आता तयार झाल्याचे तुपकर यांनी सांगितले़

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनmilkदूध