शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

मध्यप्रदेशातील माठ उस्मानाबादेत ! पांढऱ्या माठांना मिळतेय अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 19:49 IST

मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

उस्मानाबाद : दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल माठ खरेदीकडे वाढला आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिकांसोबतच अहमदाबाद, मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

उन्हाळ्याची चाहूल लागताच स्थानिक विक्रेते बाजरपेठेत लहान-मोठे माठ विक्रीसाठी घेऊन येतात. यंदा स्थानिक विक्रेत्यांसोबतच मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. पांढऱ्या मातीपासून तयार केलेले व सुबक नक्षीकाम असलेल्या या माठांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. स्थानिक कारागिरांनी काळ्या मातीपासून बनविलेल्या माठांनाही बऱ्यापैकी मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठांच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्यात आहे. १४० रूपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत किंमती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे पांढऱ्या व लाल मातीपासून बनविलेल्या माठांच्या किंमती जास्त आहेत. अडीचशे ते तीनशे रूपयांपासून माठाची किंमत सुरू होते. विक्रेत्यांकडेन सातशे रूपयांपर्यंत माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माठांच्या विक्रीत घट...जारच्या पाण्याचा मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण थंड पाण्यासाठी माठ न घेता जार घेणेच पसंत करीत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत माठ विक्री बऱ्यापैकी घटली आहे. त्यामुळे अनेक कारागीर या व्यवसायातून बाहेर पडल्याचे विक्रेते महादेव कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

रांजण ‘पाणपोई’पुरताच...पूर्वी पाणी साठविण्यासाठी रांजणाचा उपायोग केला जात होता. परंतु, रांजणाची जागा आता प्लास्टिकच्या टाक्यांनी घेतली आहे. शहरांसोबतच हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोंचले आहे. त्यामुळे मातीचे रांजण आता केवळ ‘पाणपोई’पुरतेच मर्यादित राहिले आहेत, असे विक्रते बोलून दाखवितात. 

सुरई होतये दुर्मिळ... तीन व्यक्तीची एका वेळेची तहान शमविण्याइतपत पाणी मावणारी सुरई सध्या दुर्मिळ होताना दिसत आहे. बाजारातही क्वचित विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षात तर सुरईचा वापर बंद झाल्यात जमा आहे, असे विक्रेते सांगतात.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळOsmanabadउस्मानाबाद