शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

मध्यप्रदेशातील माठ उस्मानाबादेत ! पांढऱ्या माठांना मिळतेय अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 19:49 IST

मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

उस्मानाबाद : दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल माठ खरेदीकडे वाढला आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिकांसोबतच अहमदाबाद, मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

उन्हाळ्याची चाहूल लागताच स्थानिक विक्रेते बाजरपेठेत लहान-मोठे माठ विक्रीसाठी घेऊन येतात. यंदा स्थानिक विक्रेत्यांसोबतच मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. पांढऱ्या मातीपासून तयार केलेले व सुबक नक्षीकाम असलेल्या या माठांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. स्थानिक कारागिरांनी काळ्या मातीपासून बनविलेल्या माठांनाही बऱ्यापैकी मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठांच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्यात आहे. १४० रूपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत किंमती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे पांढऱ्या व लाल मातीपासून बनविलेल्या माठांच्या किंमती जास्त आहेत. अडीचशे ते तीनशे रूपयांपासून माठाची किंमत सुरू होते. विक्रेत्यांकडेन सातशे रूपयांपर्यंत माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माठांच्या विक्रीत घट...जारच्या पाण्याचा मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण थंड पाण्यासाठी माठ न घेता जार घेणेच पसंत करीत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत माठ विक्री बऱ्यापैकी घटली आहे. त्यामुळे अनेक कारागीर या व्यवसायातून बाहेर पडल्याचे विक्रेते महादेव कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

रांजण ‘पाणपोई’पुरताच...पूर्वी पाणी साठविण्यासाठी रांजणाचा उपायोग केला जात होता. परंतु, रांजणाची जागा आता प्लास्टिकच्या टाक्यांनी घेतली आहे. शहरांसोबतच हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोंचले आहे. त्यामुळे मातीचे रांजण आता केवळ ‘पाणपोई’पुरतेच मर्यादित राहिले आहेत, असे विक्रते बोलून दाखवितात. 

सुरई होतये दुर्मिळ... तीन व्यक्तीची एका वेळेची तहान शमविण्याइतपत पाणी मावणारी सुरई सध्या दुर्मिळ होताना दिसत आहे. बाजारातही क्वचित विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षात तर सुरईचा वापर बंद झाल्यात जमा आहे, असे विक्रेते सांगतात.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळOsmanabadउस्मानाबाद