शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशातील माठ उस्मानाबादेत ! पांढऱ्या माठांना मिळतेय अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 19:49 IST

मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

उस्मानाबाद : दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा कल माठ खरेदीकडे वाढला आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन स्थानिकांसोबतच अहमदाबाद, मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. मध्यप्रदेशातील पांढऱ्या मातीच्या माठांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.  

उन्हाळ्याची चाहूल लागताच स्थानिक विक्रेते बाजरपेठेत लहान-मोठे माठ विक्रीसाठी घेऊन येतात. यंदा स्थानिक विक्रेत्यांसोबतच मध्यप्रदेशातील विक्रेतेही उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. पांढऱ्या मातीपासून तयार केलेले व सुबक नक्षीकाम असलेल्या या माठांना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. स्थानिक कारागिरांनी काळ्या मातीपासून बनविलेल्या माठांनाही बऱ्यापैकी मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या माठांच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्यात आहे. १४० रूपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत किंमती असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे पांढऱ्या व लाल मातीपासून बनविलेल्या माठांच्या किंमती जास्त आहेत. अडीचशे ते तीनशे रूपयांपासून माठाची किंमत सुरू होते. विक्रेत्यांकडेन सातशे रूपयांपर्यंत माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

माठांच्या विक्रीत घट...जारच्या पाण्याचा मागील दोन-तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण थंड पाण्यासाठी माठ न घेता जार घेणेच पसंत करीत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत माठ विक्री बऱ्यापैकी घटली आहे. त्यामुळे अनेक कारागीर या व्यवसायातून बाहेर पडल्याचे विक्रेते महादेव कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

रांजण ‘पाणपोई’पुरताच...पूर्वी पाणी साठविण्यासाठी रांजणाचा उपायोग केला जात होता. परंतु, रांजणाची जागा आता प्लास्टिकच्या टाक्यांनी घेतली आहे. शहरांसोबतच हे लोण आता ग्रामीण भागातही पोहोंचले आहे. त्यामुळे मातीचे रांजण आता केवळ ‘पाणपोई’पुरतेच मर्यादित राहिले आहेत, असे विक्रते बोलून दाखवितात. 

सुरई होतये दुर्मिळ... तीन व्यक्तीची एका वेळेची तहान शमविण्याइतपत पाणी मावणारी सुरई सध्या दुर्मिळ होताना दिसत आहे. बाजारातही क्वचित विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवल्याचे दिसून आले. मागील पाच वर्षात तर सुरईचा वापर बंद झाल्यात जमा आहे, असे विक्रेते सांगतात.

टॅग्स :Waterपाणीdroughtदुष्काळOsmanabadउस्मानाबाद