शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाचा समारोप अध्यक्षांविनाच; प्रकृती अस्वास्थ्यामुळे फादर दिब्रिटो परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 01:20 IST

मुंबईच्या रुग्णालयात केले दाखल

प्रज्ञा केळकर-सिंग 

संत गोरोबा काका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्घाटन सोहळ्यानंतर लगेचच वसईला परतले. त्यामुळे संमेलनाच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांविना समारोप होणार आहे. त्यांचे समारोपाचे भाषण वाचून दाखविले जाईल, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले म्हणाले.

संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी फादर दिब्रिटो व्हीलचेअरवरून आले होते. मला ५ जानेवारीपासून अचानक कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी दवाखान्यात दाखल व्हायला सांगितले. मात्र, संमेलनात रसिक वाट पाहत असल्याने त्यांच्या प्रेमापोटी मी उस्मानाबादला आलो. मात्र, त्रास असह्य झाल्याने मला वसईला परत जाण्याची मोकळीक द्यावी, अशी विनंती त्यांनी अध्यक्षीय भाषणानंतर साहित्यप्रेमींना केली.उद्घाटनानंतर फादर दिब्रिटो शुक्रवारी रात्रीच्या गाडीनेच वसईला रवाना झाले. त्यांना शनिवारी सकाळी वांद्रा येथील होली क्रॉस रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सिटी स्कॅन, एमआरआय आदी तपासण्या केल्यावर मणक्यातील एक नस दाबली गेल्याने डॉक्टरांनी छोटी शस्त्रक्रिया करावी लागू शकेल, असा सल्ला दिल्याचे फादर दिब्रिटो यांचे भाचे जेम्स लोबो यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

यापूर्वी महाबळेश्वर येथील संमेलनात वाद उद्भवल्याने आनंद यादव यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते संमेलनही अध्यक्षांविना पार पडले. मात्र, समारोपाला संमेलनाध्यक्ष उपस्थित नसल्याची संमेलनाच्या ९३ वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

अध्यक्षांचे भाषण वाचून दाखवूफादर दिब्रिटो यांची प्रकृती ठीक नसतानाही संमेलनाला आले, हीच खूप मोठी बाब आहे. त्रास होत असूनही त्यांनी अध्यक्षीय भाषण केले. समारोपाला त्यांची उणीव जाणवेलच; मात्र तब्येतही महत्त्वाची आहे. त्यांचे समारोपाचे भाषण वाचून दाखवण्यात येईल. - कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

महत्त्वाचे ठराव नाहीतचअभिजात भाषेचा दर्जा, बारावीपर्यंत सक्तीची मराठी, स्थानिक प्रश्न या पलीकडे जाऊन नागरिकत्व दुरुस्ती कायदा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत झालेले आक्षेपार्ह लेखन, विद्यार्थ्यांवरील हल्ला या सध्याच्या चर्चेतील महत्त्वाच्या घटनांबाबतचे ठराव यंदाच्या खुल्या अधिवेशनात मांडले जाणार नाहीत.

 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ