शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'सेनेला ठेवा दूर'; राष्ट्रवादीच्या परिवार संवादात कार्यकर्त्यांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 20:29 IST

 उस्मानाबाद येथे उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधला.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंमत देत नसल्याची तक्रार केली. शिवसेना राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थेच्या कामात बाधा आणत असल्याची तक्रार

उस्मानाबाद : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने मांडत आहे. यापार्श्वभूमीवर गुरुवारी उस्मानाबादेत झालेल्या परिवार संवादात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेला दूर ठेऊन स्वबळावर लढण्याचा सूर आळवला. तसेच ते गटातटावरही बरसले. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत संयमी शब्दात समजूत काढत मार्ग काढण्याचा शब्द दिला.

उस्मानाबाद येथे उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीशी संवाद साधला. यावेळी मंचावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, आ. विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जीवनराव गोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संवादाची सुरुवातच पदाधिकार्यांच्या अडचणी समजून घेण्यापासून करण्यात आली. एका पदाधिकार्याने शिवसेनेशी जुळवून घेणे कठीण असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांना शिवसेनेचे लोकप्रतिनिधी किंमत देत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर दुसर्यानेही तोच सूर आळवला. उलट शिवसेना राष्ट्रवादीच्या ताब्यातील संस्थेच्या कामात बाधा आणत असल्याची तक्रार केली. आतापर्यंत शिवसेनेलाच विरोध केला. आता त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे, असा सवालही त्या पदाधिकार्याने केला. काही पदाधिकार्यांनी अधिकारी आपले कोणतीच कामे ऐकत नाहीत, अशी तक्रार केली. खासदार, आमदारांच्या शिफारशी आणायला सांगतात, असे सांगताच जयंत पाटील यांनी कोणती कामे, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सावरुन त्या पदाधिकार्याने सर्वसामान्यांच्या काही कामांची उदाहरणे दिली. पाटील यांनी कोण कामे ऐकत नाहीत, त्यांची नावे द्या, आपण स्वत: त्यांना बोलू, असे सांगून समाधान केले.

आम्हाला काही किंमत आहे का...कोणत्याही पक्षातील गटतट, भांडणे ही राजकारणात सजीवपणाची लक्षणे समजली जातात. तोच प्रकार येथे पहायला मिळाला. अनेक पदाधिकार्यांनी गटातटावर तळमळीने भाष्य केले. पक्षाच्या बैठका कळविल्या जात नाहीत. फोटोत काही मोजकेच चेहरे दिसतात. ज्येष्ठांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत, त्यामुळे मग आम्ही नेमके जायचे कोणाकडे, अशा स्वरुपाच्या या तक्रारी होत्या. त्यावरही जयंत पाटील यांनी संयतपणे उत्तरे दिली.

राणादादांनी नुकसान केले...राणादादा हे पक्षाची धोरणे ठरवीत होते, आता त्यांना तिकडे धोरणे कळविली जात आहेत. त्यांचे स्वत:चेही नुकसान झाले अन् आपलेही, असे स्पष्टपणे सांगतानाच उपस्थित असलेल्या सर्व निष्ठावंत होतात म्हणून आपण येथे थांबले आहात. तुमची कुचंबणा होऊ देणार नाही. ज्यांचे गट आहेत, त्या सर्वांना रात्रीच बोलावून घेत आजच समेट घडवून आणतो. तुम्ही सर्वजण चांगले काम करणारे आहात. हे गटतट विसरुन एकदिलाने मिळून काम करु, असे सांगत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उर्जा देण्याचा प्रयत्न या संवादाच्या अखेरीस केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाOsmanabadउस्मानाबाद