शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

अध्यात्मच नव्हे तर साहित्य, शिक्षण, सरकारी यंत्रणेतही निर्माण झाले बुवा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 3:37 AM

ज्ञानोबांचे पसायदान, तुकोबांचे साहित्य कोणी समजूनच घेतले नाही़ त्यामुळे लोक कर्मकांडात गुरफटली अन् त्याचाच गैरफायदा घेणारे बुवा समाजात तयार झाल्याचा दावाही एदलाबादकर यांनी केला़

चेतन धनुरे 

उस्मानाबाद : संत साहित्याचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे बुवाबाजीचे प्रस्थ निश्चितच वाढले आहे़ परंतु, ते केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सरकारी यंत्रणेतही बुवा निर्माण झाले आहेत, असे मत विचारवंतांनी संमेलनातील परिसंवादात व्यक्त केले़

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी सायंकाळी ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले/वाढते आहे’ या विषयावर परिसंवाद झाला़ अध्यक्षस्थानी सोमनाथ कोमरपंत होते़ यावेळी डॉ़मुरहरी केळे, प्रकाश एदलाबादकर, धनराज वंजारी, मार्तंड कुलकर्णी, सचिन जाधव यांनी आपली मते व्यक्त केली़

डॉ़मुरहरी केळे म्हणाले, संतांनी आपल्या साहित्यातून अंधश्रद्धेवर प्रहार केले आहेत़ मात्र, काही ढोंगी, बुवाबाजी करणाऱ्या अपप्रवृत्ती या साहित्याचा विपर्यास करुन लोकांची फसवणूक करतात़ किर्तनासाठीही काही लोक लाखाचे बोलतात. अशा धनसंचयी वृत्तीच्या बुवांवर तुकोबारायांनी त्यांच्या कालखंडात आसूड ओढले होते़

प्रकाश एदलाबादकर यांनी काहिश्या हटके पद्धतीने मांडणी करताना इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही खापर फोडले़ या शाळांतून आपल्या संतांच्या भूमीचा इतिहास शिकविला जात नाही़ त्यामुळे संत साहित्य लपले जाईल़ शिक्षणातील ही एक प्रकारची बुवाबाजीच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले़

ज्ञानोबांचे पसायदान, तुकोबांचे साहित्य कोणी समजूनच घेतले नाही़ त्यामुळे लोक कर्मकांडात गुरफटली अन् त्याचाच गैरफायदा घेणारे बुवा समाजात तयार झाल्याचा दावाही एदलाबादकर यांनी केला़ धनराज वंजारी यांनी सरकारी यंत्रणेतील बुवाबाजीवरही शाब्दिक आसूड ओढले़ ते म्हणाले, ज्ञानेश्वरांनी पसायदानात समाज संरचना सांगितली़ मात्र, त्यातील मर्म विसरुन सरकारी यंत्रणेतील लोक ‘जो जे वांच्छिल, तो ते लाहो’ या वाक्याचा विपर्यास करीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करीत मिळकतीच्या मागे लागले आहेत़ ही सुद्धा एक प्रकारची बुवाबाजीच आहे़ ही बुवाबाजी आकलनातूनही संपणार नसून, त्यासाठी आचरणही आवश्यक असल्याचे वंजारी म्हणाले़

मार्तंड कुलकर्णी यांनी विषयाची मांडणी करताना समाजाच्या स्वैैराचारावर बोट ठेवले़ ते म्हणाले, संतांनी आपले साहित्य हे समाज सुधारणेसाठी निर्मिले होते़ मात्र, तद्नंतरच्या काळात त्याचा विपर्यास करुन बुवांनी समाजाला स्वैर केले़ ज्यांचे चित्तच शुद्ध नाही असे ढोंगी समाजात अंधश्रद्धा पेरत आहेत़ त्यामुळे संतांचे साहित्य घरोघरी पोहोचवून त्याचा खरा मर्म लोकांना सांगण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले़

डॉ़सचिन जाधव यांनी बुवाबाजीला सुशिक्षित, सधन लोकांमुळेच आश्रय मिळत असल्याचा दावा केला़ या व्यक्ती संकटे आली की आधार शोधत ढोंगी, बुवांना शरण जावून त्यात गुरफटतात़ समाजात हेच अनुकरण चालत राहते़ खरे पाहिल्यास यातून बाहेर पडण्याचा मार्ग संत साहित्यात आहे़ मात्र, समाजात उलटी गंगा वाहते आहे़ अध्यक्षीय समारोपात सोमनाथ कोमरपंत यांनी संत साहित्यावर आपले विवेचन करतानाच परिसंवादाचा सार मांडला़ परिसंवादाचे सूत्रसंचालन कमल नलावडे यांनी केले़ आभार एस़डी़ कुंभार यांनी मानले़ 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन