शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज मिळेना, शासकीय योजना सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : बँकाचे उंबरठे झिझवूनही पीक कर्ज मिळेनासे झाले, शासनाच्या शेतीसंदर्भात किती योजना आहेत. त्याची माहिती मिळेल का? असे ...

उस्मानाबाद : बँकाचे उंबरठे झिझवूनही पीक कर्ज मिळेनासे झाले, शासनाच्या शेतीसंदर्भात किती योजना आहेत. त्याची माहिती मिळेल का? असे विविध प्रश्नाबाबत ९१६ कॉल शिवार हेल्पलाईनकडे मागील सात महिन्यात धडकले आहेत. तणावाची मानसिकता, आत्महत्येच्या विचारातून ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना नाजूक अवस्थेतून मानसिकरीत्या बाहेर काढून जाण्याची नवी उमेद शिवार हेल्पलाइनच्या मानसोपचार तज्ज्ञांनी दिली. काहींच्या कर्जप्रकरणासाठी थेट बँकेसोबत संपर्क साधून मार्गदर्शनही केले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात जून महिन्यापासून शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नव्हते. त्यामुळे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान बियाणे उगवले नाही याबाबत २३ जणांनी फोन केले होते. बदलत्या वातावरणामुळे पिकांनाही फटका बसत असतो, त्यामुळे हवामान अंदाजाबाबतही १४ शेतकऱ्यांचे कॉल धडकले होते. याशिवाय पीक विमा मिळेना २९५ शेतकऱ्यांनी फोन केला आहे. कृषी विभागाकडून शेतीसंदर्भात विविध योजना राबविल्या जात असतात. मात्र, या योजनांची म्हणावी तशी जनजजागृती केली जात नाही. त्यामुळे शेतीच्या योजनेसंदर्भात २८२ कॉल आले आहेत. याशिवाय, कर्जमाफीबाबत २९ व्यक्तींनी संपर्क साधला होता. शेतरस्ताच्या वादासंदर्भात ९१ जणांनी फोन केले. पी.एम. किसान १३, पीक कर्ज ४४, हेल्पलाइनबद्दल माहिती ३०, कर्जमाफी २९, शासकीय अनुदान अडचण १०, नुकसान भरपाई ९, बँक संबंधी अडचण ९, शैक्षणिक मदतविषयी ६, रेशनसंबंधी ६, डीपीसंबंधी अडचण ६, कौटुंबिक वाद ५, रानडुकरांचा त्रास ४, बाजारभाव व मार्केट ४, ऊस बिल ३, होम लोन ३, खात्यातून पैसे गेले ३, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ३, रोजगार पाहिजे ३, आरोग्य शिबिर माहिती २, सावकारकडून फसवणूक झाल्याचे दोन फोन धडकले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचे मार्गदर्शन करून प्रश्नाचे निरसन केले. काही प्रकरणात फोनवरून संबंधितांना संपर्क साधून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही केला.

सर्वाधिक ३९२ कॉल उस्मानाबाद तालुक्यातून

शिवार हेल्पलाइनकडे मागील सात महिन्यांच्या कालावधीत उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ३९२ कॉल आले आहेत. त्याखालोखाल तुळजापूर तालुक्यातून १२९, कळंब १०९, उमरगा ९६, भूम ५६, लोहारा ४२, वाशी २४, परंडा तालुक्यातून १५ कॉल करण्यात आले होते.

३० ते ४० वयोगटातून सर्वाधिक फोन

शिवार हेल्पलाइनकडे विविध प्रश्नाबाबत फोन ३० ते ४० वयोगटातील येत आहेत. या वयोगटातील ३२१ जणांनी सात महिन्यात फोन केले आहेत. २० ते ३० वयोगटातील व्यक्तींचे ३१० फोन, ४० ते ५० वयोगटातील १७० फोन आले होते. ९६ फोन ५० वयाच्या पुढील व्यक्तीने केले आहेत. तर १५ ते १९ वयोगटातील व्यक्तींनी १९ फोन केले होते.

कोट...

शिवार हेल्पलाइनला संपर्क केेलेल्या शेतकऱ्यांपैकी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आत्महत्येचे विचार, तणावग्रस्त, त्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्याच्या विचारात असलेल्या ७० जणांनी फोन केले होते. यात तीव्र स्वरूपाचे २, मध्यम स्वरूपाचे ६३, सौम्य स्वरूपाचे ५ जणांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना या विचारातून मानसिकरित्या बाहेर काढले आहे.

अशोककुमार कदम, जिल्हा समन्वयक, शिवार हेल्पलाइन