शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पीक कर्ज मिळेना, शासकीय योजना सांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : बँकाचे उंबरठे झिझवूनही पीक कर्ज मिळेनासे झाले, शासनाच्या शेतीसंदर्भात किती योजना आहेत. त्याची माहिती मिळेल का? असे ...

उस्मानाबाद : बँकाचे उंबरठे झिझवूनही पीक कर्ज मिळेनासे झाले, शासनाच्या शेतीसंदर्भात किती योजना आहेत. त्याची माहिती मिळेल का? असे विविध प्रश्नाबाबत ९१६ कॉल शिवार हेल्पलाईनकडे मागील सात महिन्यात धडकले आहेत. तणावाची मानसिकता, आत्महत्येच्या विचारातून ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना नाजूक अवस्थेतून मानसिकरीत्या बाहेर काढून जाण्याची नवी उमेद शिवार हेल्पलाइनच्या मानसोपचार तज्ज्ञांनी दिली. काहींच्या कर्जप्रकरणासाठी थेट बँकेसोबत संपर्क साधून मार्गदर्शनही केले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी जिल्ह्यात जून महिन्यापासून शिवार हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नव्हते. त्यामुळे जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान बियाणे उगवले नाही याबाबत २३ जणांनी फोन केले होते. बदलत्या वातावरणामुळे पिकांनाही फटका बसत असतो, त्यामुळे हवामान अंदाजाबाबतही १४ शेतकऱ्यांचे कॉल धडकले होते. याशिवाय पीक विमा मिळेना २९५ शेतकऱ्यांनी फोन केला आहे. कृषी विभागाकडून शेतीसंदर्भात विविध योजना राबविल्या जात असतात. मात्र, या योजनांची म्हणावी तशी जनजजागृती केली जात नाही. त्यामुळे शेतीच्या योजनेसंदर्भात २८२ कॉल आले आहेत. याशिवाय, कर्जमाफीबाबत २९ व्यक्तींनी संपर्क साधला होता. शेतरस्ताच्या वादासंदर्भात ९१ जणांनी फोन केले. पी.एम. किसान १३, पीक कर्ज ४४, हेल्पलाइनबद्दल माहिती ३०, कर्जमाफी २९, शासकीय अनुदान अडचण १०, नुकसान भरपाई ९, बँक संबंधी अडचण ९, शैक्षणिक मदतविषयी ६, रेशनसंबंधी ६, डीपीसंबंधी अडचण ६, कौटुंबिक वाद ५, रानडुकरांचा त्रास ४, बाजारभाव व मार्केट ४, ऊस बिल ३, होम लोन ३, खात्यातून पैसे गेले ३, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ३, रोजगार पाहिजे ३, आरोग्य शिबिर माहिती २, सावकारकडून फसवणूक झाल्याचे दोन फोन धडकले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचे मार्गदर्शन करून प्रश्नाचे निरसन केले. काही प्रकरणात फोनवरून संबंधितांना संपर्क साधून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही केला.

सर्वाधिक ३९२ कॉल उस्मानाबाद तालुक्यातून

शिवार हेल्पलाइनकडे मागील सात महिन्यांच्या कालावधीत उस्मानाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ३९२ कॉल आले आहेत. त्याखालोखाल तुळजापूर तालुक्यातून १२९, कळंब १०९, उमरगा ९६, भूम ५६, लोहारा ४२, वाशी २४, परंडा तालुक्यातून १५ कॉल करण्यात आले होते.

३० ते ४० वयोगटातून सर्वाधिक फोन

शिवार हेल्पलाइनकडे विविध प्रश्नाबाबत फोन ३० ते ४० वयोगटातील येत आहेत. या वयोगटातील ३२१ जणांनी सात महिन्यात फोन केले आहेत. २० ते ३० वयोगटातील व्यक्तींचे ३१० फोन, ४० ते ५० वयोगटातील १७० फोन आले होते. ९६ फोन ५० वयाच्या पुढील व्यक्तीने केले आहेत. तर १५ ते १९ वयोगटातील व्यक्तींनी १९ फोन केले होते.

कोट...

शिवार हेल्पलाइनला संपर्क केेलेल्या शेतकऱ्यांपैकी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आत्महत्येचे विचार, तणावग्रस्त, त्रस्त शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. आत्महत्याच्या विचारात असलेल्या ७० जणांनी फोन केले होते. यात तीव्र स्वरूपाचे २, मध्यम स्वरूपाचे ६३, सौम्य स्वरूपाचे ५ जणांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना या विचारातून मानसिकरित्या बाहेर काढले आहे.

अशोककुमार कदम, जिल्हा समन्वयक, शिवार हेल्पलाइन