शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला'; सरनाईक यांच्यानंतर सेनेचे मंत्री गडाख यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 18:33 IST

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रमावर निर्माण केली आहे.

उस्मानाबाद : सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला गेला आहे. राजकारणात असे प्रकार घडतातच. मात्र, कुटूंबियांना त्रास देण्याचे प्रकार आता सुरु झाल्याचा दावा करीत मृद व जलसंधारण मंत्री शंकररराव गडाख यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन मार्ग काढतील, अशी अपेक्षा सोमवारी उस्मानाबादेत व्यक्त केली.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेण्याच्या मुद्यास त्यांनी सहमती दर्शविली नाही. ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या भावना मनमोकळ्यापणे मांडल्या आहेत. ज्यांना-ज्यांना असा त्रास होतोय, ते लोक आता बोलत आहेत. अलिकडे तपास यंत्रणांचा वापर करुन कुटूंबियांना त्रास दिला जात आहे. मलाही त्रास दिला गेला. आमदार नसताना एका शेतकरी आंदोलनाच्या गुन्ह्यात न्यायालयाच्या तारखेची नोटीस मिळाली नव्हती. त्यामुळे हजर राहता आले नाही. तेव्हा मोठा फौजफाटा घरी पाठवून धाड टाकण्यात आली. तेव्हा गृहमंत्रीपद भाजपकडे होते.

तिन्ही पक्षांचे नेते मार्ग काढतील

महाविकास आघाडी ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रमावर निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होणारा त्रास थांबविण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते यातून काहीतरी मार्ग काढतील, अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली. या अपेक्षेद्वारे आ. सरनाईकांच्या पत्रातील भावनेला समर्थन देतानाच राजकारणात हे चालच असते, असे सांगत जुळवून घेण्याच्या मुद्यास मात्र गडाख यांनी असहमती दर्शविली.

टॅग्स :Shankarrao Gadakhशंकरराव गडाखOsmanabadउस्मानाबादShiv Senaशिवसेना