शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

'सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला'; सरनाईक यांच्यानंतर सेनेचे मंत्री गडाख यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 18:33 IST

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रमावर निर्माण केली आहे.

उस्मानाबाद : सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला गेला आहे. राजकारणात असे प्रकार घडतातच. मात्र, कुटूंबियांना त्रास देण्याचे प्रकार आता सुरु झाल्याचा दावा करीत मृद व जलसंधारण मंत्री शंकररराव गडाख यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन मार्ग काढतील, अशी अपेक्षा सोमवारी उस्मानाबादेत व्यक्त केली.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेण्याच्या मुद्यास त्यांनी सहमती दर्शविली नाही. ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या भावना मनमोकळ्यापणे मांडल्या आहेत. ज्यांना-ज्यांना असा त्रास होतोय, ते लोक आता बोलत आहेत. अलिकडे तपास यंत्रणांचा वापर करुन कुटूंबियांना त्रास दिला जात आहे. मलाही त्रास दिला गेला. आमदार नसताना एका शेतकरी आंदोलनाच्या गुन्ह्यात न्यायालयाच्या तारखेची नोटीस मिळाली नव्हती. त्यामुळे हजर राहता आले नाही. तेव्हा मोठा फौजफाटा घरी पाठवून धाड टाकण्यात आली. तेव्हा गृहमंत्रीपद भाजपकडे होते.

तिन्ही पक्षांचे नेते मार्ग काढतील

महाविकास आघाडी ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रमावर निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होणारा त्रास थांबविण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते यातून काहीतरी मार्ग काढतील, अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली. या अपेक्षेद्वारे आ. सरनाईकांच्या पत्रातील भावनेला समर्थन देतानाच राजकारणात हे चालच असते, असे सांगत जुळवून घेण्याच्या मुद्यास मात्र गडाख यांनी असहमती दर्शविली.

टॅग्स :Shankarrao Gadakhशंकरराव गडाखOsmanabadउस्मानाबादShiv Senaशिवसेना