शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला'; सरनाईक यांच्यानंतर सेनेचे मंत्री गडाख यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 18:33 IST

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रमावर निर्माण केली आहे.

उस्मानाबाद : सत्तेचा गैरवापर करुन मलाही त्रास दिला गेला आहे. राजकारणात असे प्रकार घडतातच. मात्र, कुटूंबियांना त्रास देण्याचे प्रकार आता सुरु झाल्याचा दावा करीत मृद व जलसंधारण मंत्री शंकररराव गडाख यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन मार्ग काढतील, अशी अपेक्षा सोमवारी उस्मानाबादेत व्यक्त केली.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र वायरल झाल्यानंतर मंत्री शंकरराव गडाख यांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्या काही भावनांना समर्थनच दर्शविले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेण्याच्या मुद्यास त्यांनी सहमती दर्शविली नाही. ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या भावना मनमोकळ्यापणे मांडल्या आहेत. ज्यांना-ज्यांना असा त्रास होतोय, ते लोक आता बोलत आहेत. अलिकडे तपास यंत्रणांचा वापर करुन कुटूंबियांना त्रास दिला जात आहे. मलाही त्रास दिला गेला. आमदार नसताना एका शेतकरी आंदोलनाच्या गुन्ह्यात न्यायालयाच्या तारखेची नोटीस मिळाली नव्हती. त्यामुळे हजर राहता आले नाही. तेव्हा मोठा फौजफाटा घरी पाठवून धाड टाकण्यात आली. तेव्हा गृहमंत्रीपद भाजपकडे होते.

तिन्ही पक्षांचे नेते मार्ग काढतील

महाविकास आघाडी ही तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रमावर निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होणारा त्रास थांबविण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते यातून काहीतरी मार्ग काढतील, अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली. या अपेक्षेद्वारे आ. सरनाईकांच्या पत्रातील भावनेला समर्थन देतानाच राजकारणात हे चालच असते, असे सांगत जुळवून घेण्याच्या मुद्यास मात्र गडाख यांनी असहमती दर्शविली.

टॅग्स :Shankarrao Gadakhशंकरराव गडाखOsmanabadउस्मानाबादShiv Senaशिवसेना