शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

आपरेशन झालयं...५० मैलावरून आलो, इथं दवाच नाय, चाललो आता आल्या पाऊली!

By सूरज पाचपिंडे  | Updated: October 4, 2023 14:52 IST

नाव माेठं अन् लक्षण खाेटं, आणखी दुसरं काय? इथं खायला पैका नाय, बाहेरून दवा-गाेळ्या कशानं घेऊ?

धाराशिव : ‘हार्नियाचं आपरेशन झालयं...माेठ्ठा दवाखाना हाय म्हणून ५० मैलावरून इथं आलाेया...मात्र इथं दवाच नाय...तिथलं साहेब बाहेरून घ्या म्हटल्यांती...इथं खायला पैका नाही, तर बाहेरून दवा-गाेळ्या कशानं घेणार? चाललाे आता आल्या पाऊली...नाव माेठं अन् लक्षण खाेटं, आणखी दुसरं काय? अशा शब्दात संताप व्यक्त करीत ६७ वर्षीय आजाेबा औषधं न घेताच आल्या पाऊली परतले. हे वास्तव कुण्या उपकेंद्र वा प्राथमिक आराेग्य केंद्रातील नव्हं, तर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आहे. हे प्रातिनिधिक उदाहरण. जाे-ताे असेच काहीसे शब्द, वाक्य पुटपुटत रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत हाेता.

केंद्र आणि राज्य सरकार विकासाच्या गप्पा मारीत आहे. दरराेज वेगवेगळ्या घाेषणांचा पाऊस पाडला जात आहे. काेट्यवधीचे आकडे वाचून दाखविले जाताहेत. मात्र, मेडिकल काॅलेजसारख्या दवाखान्यात सर्वसामान्यांना साधी-साधी औषधं मिळणं कठीण झालं आहे. मंगळवारी प्रस्तूत प्रतिनिधीने रुग्णालयात फेरफटका मारला असता, दवा-गाेळ्यांच्या बाबतीत विदारक वास्तव समाेर आले. राज्याचे आराेग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या भूम तालुक्यातील ६७ वर्षीय बाजीराव लाेखंडे हे मेडिकल काॅलेजच्या दवाखान्यात आले हाेते. डाॅक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन ते औषधांच्या कक्षाकडे गेले. कर्मचाऱ्याच्या हाती चिठ्ठी साेपविली असता, ‘इंथं यातलं एकही औषध नाही. बाहेरून घ्या’, असा सल्ला देत त्यांच्या हाती चिठ्ठी ठेवली. ‘‘आहाे, इंथं सर्व दवा-गाेळ्या मिळत्याती म्हणून तर ५० मैलावरून इथं आलाेया. खायला जवळ पैका नाही. मग बाहेरून दवा घेऊ कशानं?’’ असा हतबल प्रश्न करीत ते पायऱ्या उतरून दवाखान्याबाहेर पडले.

प्रवेशद्वारासमाेरच असलेल्या खासगी मेडिकलमध्ये गेले. मेडिकलवाल्याच्या हाती चिठ्ठी दिली असता, ‘‘बाबा, २०६ रुपये हाेतात. देऊ का गाेळ्या’’, असा आवाज पुढणं आला. किती पैसं हायती म्हणून त्यांनी खिशात हात घातला असता, हाताला ५० रुपयेच लागले. ‘‘एवढंच हायती, बघू चिठ्ठी माघारी’’, असं म्हणत त्यांनी चिठ्ठी घेऊन खिशात घातली. ‘‘नाव माेठं अन् लक्षण खाेटं’’ अशा शब्दात संताप व्यक्त करीत आजाेबा आल्या पाऊली परतले. हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी अशाच शब्दात संताप व्यक्त करीत बहुतांशी रुग्ण, नातेवाईक खासगी मेडिकल गाठताना दिसत हाेते, हे विशेष.

आराेग्य मंत्र्यांना आलेला अनुभव रुग्ण दरराेजच घेताहेत...गतवर्षी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये रांगेत उभा राहून कॅल्शियम गोळीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना गोळी मिळाली नव्हती. यानंतर तरी पुरवठा सुरळीत हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, वर्षभरानंतरही रुग्णालयात कॅल्शियम गाेळीचा तुटवडा कायम आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादhospitalहॉस्पिटल