शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
2
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी...', अजित पवार यांचं विधान
3
"कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
4
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
5
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
6
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
7
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
8
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
9
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
10
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
11
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
12
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
13
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
14
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
15
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
16
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
17
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
18
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
19
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
20
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन

गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण...

By महेश गलांडे | Published: April 17, 2019 2:44 PM

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे.

उस्मानाबाद - लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात असलेल्या असुविधांबद्दल उमेदवार आणि स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी दर्शवत अख्ख गावचं मतदानावर बहिष्कार टाकत आहे. विशेष म्हणजे या गावातील तरुण मुलगा आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड हे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार असून त्यांनाही मतदानावर बहिष्कार टाकण्याची विनंती गावकऱ्यांनी केली आहे.   

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. तर, शिवसेनेकडून माजी आमदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाला लोकसभा निवडणुकांसाठी उस्मानाबाद या मतदारसंघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील हक्काचा उमेदवार म्हणून तालुक्यातील वाणेवाडी गावचे पुत्र शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रस्थापितांविरुद्ध लढण्यासाठी शेतकरी नेता असलेल्या शंकर गायकवाड यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता उमेदवारी कायम ठेवली. मात्र, येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शंकर गायकवाड यांना गावातील एकही मत मिळणार नाही. विशेष म्हणजे शंकर यांच्या आई-वडिलांचेही मतदान शंकर यांना पडणार नाही. कारण, या गावातील सर्वच गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील समस्या सोडविण्यात स्थानिक नेते अपयशी ठरल्याचे सांगत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 

उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय एकमताने घेतला असून सर्वच गावकरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साधारणत: 1200 ते 1300 लोकसंख्या आणि 800 मतदान असलेल्या या गावात अनेक स्थानिक नेत्यांनी संपर्क केला. मात्र, अद्याप गावकरी मानायला तयार नाहीत. ग्रामस्थांनी चक्क गावाच्या बाहेर एक डीजिटल फलक झळकावला आहे. त्यामध्ये वाणेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार असे लिहिले आहे. तसेच, गावकऱ्यांकडून पत्रेकही छापण्यात आली आहेत. त्या पत्रकारवरही ''अभी नही तो कभी नही'' असा संदेश लिहून गावातील  समस्यांची यादीच देण्यात आली आहे. 

गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची वैशिष्टे गावात येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही.पाण्याची कसलिही सोय नाही.देश स्वतंत्र झाल्यापासून बससेवा नाही.जिल्हा परिषद शाळा पडझडीस आली आहे, तर शाळेकडे कुठल्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसते. अनेक गोर-गरीब ग्रामस्थांना रेशनकार्ड नाही. शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. सरकारी अधिकाऱ्यांचे गावाकडं दुर्लक्षअसे मुद्दे गावकऱ्यांनी छापलेल्या पत्रकात लिहिलेली आहेत.

उमेदवार शंकर गायकवाड 

उस्मानाबद लोकसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये प्रमुख लढत ही महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेचे नेते राणा जगजितसिंह तर  शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात होत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला आहे. तर, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, चळवळीतून उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकरी नेता म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. शंकर गायकवाड यांनी अनेक आंदोलनातून शेतकरी वर्गाला न्याय मिळवून दिला आहे. तर, स्थानिक प्रश्नांसाठी आंदोलन करुन जनतेचे प्रश्नही अनेकदा मार्गी लावले आहेत. मात्र, अद्यापही गावातील प्रश्न अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे यंदा गावकऱ्यांनी जी भूमिका घेतली त्यास आपलाही पाठिंबा असल्याचे शंकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.   

गावकऱ्यांच्या भूमिकेला माझाही पाठिंबा आहे, पण मी उमेदवार असल्याने मतदान करणे बंधनकारक आहे. मी मतदान न केल्यास कायदेशीर भंग होईल, असे तहसिलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र, माझ्या कुटुंबातील सदस्य, माझे आई-वडिल आणि बायकोचेही मला मतदान मिळणार नसल्याचे शंकर यांनी म्हटले. तसेच, मला मिळणाऱ्या मतदानापेक्षा माझ्या गावकरांचे प्रश्न सुटणे गरजेचं असल्याचंही शंकर गायकवाड यांनी सांगितलं.  

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Votingमतदान