शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मध्येच बोलले...
2
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
3
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
4
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
5
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
6
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
7
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
8
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
9
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
10
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
11
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
12
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
13
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
14
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
15
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
16
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
17
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
18
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
19
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
20
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी

शहरातील निम्म्या लोकांना मिळाला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:37 AM

उस्मानाबाद : पदरी पडतील तितक्या लसींचे योग्य नियोजन करीत त्या वाया जाणार नाहीत याची काळजी घेऊन जिल्ह्यात लसीकरण सुरू ...

उस्मानाबाद : पदरी पडतील तितक्या लसींचे योग्य नियोजन करीत त्या वाया जाणार नाहीत याची काळजी घेऊन जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. त्यामुळे शहरी भागातील निम्म्या लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस मिळू शकला. ५१ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करून हा एक मोठा टप्पा आरोग्य विभागाने गाठला असला तरी लसींच्या अभावामुळे दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा लागून आहे.

कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जिल्ह्यातील शहरी भागांतील २ लाख ८९ हजार ९८ नागरिक पात्र आहेत. यामध्ये सर्वाधिक १ लाख ६८ हजार ६४० नागरिक हे १८ ते ४४ वयोगटातील आहेत. यापैकी ३९ टक्के म्हणजेच ६५ हजार ९९२ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या १२ हजार ९१५ इतकी आहे. ४५ ते ५९ वयोगटातील ८० हजार ३०५ नागरिकांना लस द्यायची आहे. यापैकी २९ हजार २५८ जणांना पहिला, तर त्यातील १६ हजार ६२१ जणांना दुसराही डोस मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण चांगले झाले आहे. आतापर्यंत शहरी भागातील २७ हजार ८१६ जणांना पहिला, तर यातील १७ हजार ४९५ जणांना दुसराही डोस मिळू शकला आहे. एकूण ४० हजार १५३ ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे.

ग्रामीणचीही टक्केवारी वधारतेय...

लसीचे सर्वाधिक लाभार्थी ग्रामीण भागात आहेत. एकूण ९ लाख ७० हजार १५९ नागरिकांना लस द्यायची आहे. यापैकी २ लाख ३७ हजार ७८१ नागरिकांना पहिला डोस मिळाला आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ७९ हजार ४९८ आहे. ग्रामीण भागातील ७५ टक्के ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला, तर ५ टक्केच तरुण व प्रौढांना पहिला डोस मिळाला आहे.

४ लाखांकडे सुरू आहे कूच...

जिल्ह्यात लस घेण्यासाठी १२ लाख ५९ हजार २५७ नागरिक पात्र आहेत. यापैकी आतापर्यंत ३० टक्के म्हणजेच ३ लाख ८५ हजार ७१५ जणांना पहिला डोस मिळाला आहे. येत्या पाच-सहा दिवसांमध्ये ४ लाखांचा आकडा ओलांडला जाईल. दरम्यान, यातील १ लाख ४२ हजार ९५२ जणांना दुसराही डोस मिळाला आहे. एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत दोन्ही डोस मिळविलेल्या नागरिकांची टक्केवारी ११.३५ आहे.