शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सरकार काही व्यापारी नाही,मोठ्या कंपन्यांना आमंत्रित करून चांगला भाव मिळवून देऊ - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 11:10 IST

गेल्या तीन वर्षांत शेतमालाचे उत्पादन प्रचंड वाढले आहे़ सरकार काही व्यापारी नाही जो इतका शेतमाल खरेदी करु शकेल़ मात्र, चांगला भाव मिळावा यासाठी मोठ्या कंपन्यांना खरेदीसाठी आंमत्रित करुन त्यांच्या मार्फत चांगला भाव मिळवून देण्याचे मॉडेल लवकरच अवलंबिण्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी उस्मानाबादेत दिले़

ठळक मुद्देसंपूर्ण शेतमाल सरकार खरेदी करु शकत नाही, असे सांगून त्यासाठी एक नवे मॉडेल अवलंबिणार यापूर्वी रस्तेच चांगले बनविले नसल्याने खड्डे पडत आहेत़ खड्डे पडणे हे काही नवीन बाब नाही़

उस्मानाबाद : गेल्या तीन वर्षांत शेतमालाचे उत्पादन प्रचंड वाढले आहे़ सरकार काही व्यापारी नाही जो इतका शेतमाल खरेदी करु शकेल़ मात्र, चांगला भाव मिळावा यासाठी मोठ्या कंपन्यांना खरेदीसाठी आंमत्रित करुन त्यांच्या मार्फत चांगला भाव मिळवून देण्याचे मॉडेल लवकरच अवलंबिण्याचे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी उस्मानाबादेत दिले़

खड्डेमुक्तीच्या आढावा बैठकीसाठी महसूलमंत्री गुरुवारी सकाळी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी चांगल्या पावसामुळे व गाळ उपसल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होवून शेतमालाचे उत्पादन प्रचंड वाढल्याचे सांगितले़ हा संपूर्ण शेतमाल सरकार खरेदी करु शकत नाही, असे सांगून त्यासाठी एक नवे मॉडेल अवलंबिणार असल्याचेही ते म्हणाले़ रस्त्यांबाबत बोलताना पाटील म्हणाले, यापूर्वी रस्तेच चांगले बनविले नसल्याने खड्डे पडत आहेत़ खड्डे पडणे हे काही नवीन बाब नाही़ मात्र, आता केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात २२ हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, साडेसहा हजार किलोमीटरचे सहापदरी रस्ते भारतमाला योजनेंतर्गत व मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून काही असे जवळपास ३८ हजार किलोमीटरचे पक्के रस्ते येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार आहेत़ या रस्त्यांवर पुढची दहा-बारा वर्षे तरी खड्डे पडणार नाहीत, असा दर्जा राखण्यात येणार आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़

असे असेल शेतमाल खरेदीचे मॉडेल़़कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्यांशी सरकार शेतमाल खरेदीसंदर्भात करार करेल़ त्यांना बाजारात उतरुन चांगल्या दराने शेतमाल खरेदी करावयास लावेल़ या शेतमालातून ते  जे उत्पादन तयार करतील त्यातून त्यांना फायदा झाला तर तो त्यांचा़ जर नुकसान होत असेल तर त्यांची बॅलन्सशीट पाहून सरकार त्यांना मदतीचा विचार करेल़ लवकरच्या या मॉडेलचा अवलंब करण्याचा प्रयत्न सरकार करेल, असे संकेत महसूलमंत्र्यांनी दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील