शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीपूत्र जागीच ठार : भाजीपाला विकून गावाकडे परतताना दुचाकीला कंटेनरने उडवले

By बाबुराव चव्हाण | Updated: August 27, 2023 19:35 IST

एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला...

येणेगूर (जि. धाराशिव) : शेतात पिकविलेला भाजीपाला मुरूम येथील बाजारपेठेत विक्री करून गावाकडे परतत असतानाच भरधाव कंटेनेरने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात ३३ वर्षीय शेतकरीपूत्र जागीच ठार झाला. एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुरूम मोड येथे घडली.

उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील ज्ञानेश्वर युवराज माने (३३) हे रविवारी भाजीपाला घेऊन मुरूमच्या बाजारात गेले हाेते. भाजीपाला विक्री करून साधारपणे दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ते आपल्या गावाकडे परतत हाेते. त्यांची दुचाकी मुरूम माेडनजीक आली असता, नळदुर्गहून उमरग्याकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने (क्र. एनएल.०१/२२९०) जाेराची धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर माने जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकी अक्षरश: चक्काचूर झाली.  दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकाॅं. संजय शिंदे, मारूती मडोळे, मसाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मुरूम पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली असून पुढील तपास पाेहेकाॅं. संजय शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, मयत ज्ञानेश्वर हा, एकुलता एक मुलगा हाेता. ताेही या अपघाती घटनेत गमावला. त्यामुळे माने कुटुंबाचा आधार गेला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दाेन मुले असा परिवार आहेत.

चालकाने केला पाेबारा...

उमरग्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्यानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पाेबारा केला. पाेलीस आता संबंधित चालकाचा शाेध घेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरीDeathमृत्यू