शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतकरीपूत्र जागीच ठार : भाजीपाला विकून गावाकडे परतताना दुचाकीला कंटेनरने उडवले

By बाबुराव चव्हाण | Updated: August 27, 2023 19:35 IST

एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला...

येणेगूर (जि. धाराशिव) : शेतात पिकविलेला भाजीपाला मुरूम येथील बाजारपेठेत विक्री करून गावाकडे परतत असतानाच भरधाव कंटेनेरने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात ३३ वर्षीय शेतकरीपूत्र जागीच ठार झाला. एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबाचा आधार गेला आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुरूम मोड येथे घडली.

उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील ज्ञानेश्वर युवराज माने (३३) हे रविवारी भाजीपाला घेऊन मुरूमच्या बाजारात गेले हाेते. भाजीपाला विक्री करून साधारपणे दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ते आपल्या गावाकडे परतत हाेते. त्यांची दुचाकी मुरूम माेडनजीक आली असता, नळदुर्गहून उमरग्याकडे निघालेल्या भरधाव कंटेनरने (क्र. एनएल.०१/२२९०) जाेराची धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर माने जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकी अक्षरश: चक्काचूर झाली.  दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकाॅं. संजय शिंदे, मारूती मडोळे, मसाळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मुरूम पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली असून पुढील तपास पाेहेकाॅं. संजय शिंदे हे करीत आहेत. दरम्यान, मयत ज्ञानेश्वर हा, एकुलता एक मुलगा हाेता. ताेही या अपघाती घटनेत गमावला. त्यामुळे माने कुटुंबाचा आधार गेला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दाेन मुले असा परिवार आहेत.

चालकाने केला पाेबारा...

उमरग्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्यानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पाेबारा केला. पाेलीस आता संबंधित चालकाचा शाेध घेत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरीDeathमृत्यू