शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या लेकीने मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 05:49 IST

साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात...

- बालाजी अडसूळकळंब (जि़ उस्मानाबाद) : कडकनाथ घोटाळ्याची झळ उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसलेली आहे़ याच घोटाळ्यात फसलेल्या कळंब तालुक्यातील देवळालीतील एका शेतकºयाच्या तोंडून दररोज मरणाची भाषा ऐकणाºया त्याच्या तिसरीतील कन्येने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून मदतीसाठी आर्त हाक दिली आहे. धनश्री आश्रूबा बिक्कड असे तिचे नाव आहे. देवळाली जि. प. शाळेत तिसरीच्या वर्गात धनश्री शिकते. शिक्षक मारूती खुडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मान्यवरांना शुभेच्छापत्र लिहिण्यास विद्यार्थ्यांना सांगितले. धनश्रीने थेट मुख्यमंत्र्यांना शुभेच्छापत्र लिहिले होते. यात कष्टकरी बापाची निसर्ग व व्यवस्थेने कशी झोप उडवली आहे, हे तिने मांडले आहे. हे पत्र मंगळवारी सोशल मीडियात व्हायरल झाले.धनश्रीचे वडील आश्रूबा बिक्कड यांची कडकनाथ घोटाळ्यात फसगत झाली आहे. वडील मरणाची भाषा करीत असल्याने आपणास भीती वाटते, कडकनाथ घोटाळ्यात अडकलेले पैसे मिळवून देण्याची विनंती तिने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़पप्पा टेन्शनमध्ये असतातधनश्री लिहिते, ‘‘साहेब, माझे पप्पा शेतकरी आहेत. मात्र, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्यावेळी पाऊसच पडत नाही. मग शेतात काहीच धान उगवत नाही. यामुळे पप्पा सारखं टेन्शनमध्ये असतात. चिडचिड करतात. मम्मीवर रागावतात, माझ्यावरही चिडतात. यापेक्षा मरण बरं म्हणतात़ आमच्या शाळेत पेपर येतो, तो आम्ही वाचतो. यात शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या असतात. त्यामुळे लयं, लयं घाबरायला येते.’’ 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरी