शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

लाचखोरांची भुताटकी बळीराजाच्या मानगुटीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:27 IST

विश्लेषण : ‘अस्मानी’ संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाचेच्या माध्यमातून ‘सुलतानी’ छळवणूक होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़

- चेतन धनुरे 

अवर्षणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी, सामान्यांच्या खिश्यात कडकी निर्माण केलेली असतानाही लाचखोर नोकरदारांचा खिसा मात्र, टम्म फुगताना दिसत आहे़ गेल्या वर्षभरात ३० कारवाया झाल्यानंतरही नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुन्हा दोन लाचखोर गळाला लागले़ यातही अवर्षणाप्रमाणेच लाचखोरीची भुताटकी शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर बसलेली अधिक पहायला मिळतेय.

सततच्या अवर्षणाने ‘अस्मानी’ संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाचेच्या माध्यमातून ‘सुलतानी’ छळवणूक होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़ साल २०१८ मध्ये लाचखोरीची एकूण ३० प्रकरणे उजेडात आली़ यात ४३ लाचखोर जाळ्यात अडकले़ त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ४८ हजार २०० रुपयांची लाच स्विकारण्यात आली होती़ यात अगदी ५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत लाच घेण्यात आली होती़ दरम्यान, या तीस कारवायांपैकी ९ कारवाया या शेतकरी, पशुपालकांच्या तक्रारीवरुन झाल्या आहेत़ सातबारा उतारा देण्यासाठी, फेर मंजूर करण्यासाठी, चराई पास देण्यासाठी ते कृषीपंपाला विद्युत जोडणी देण्यापर्यंत वेगवेगळ्या कारणासाठी लाचखोरांनी शेतकऱ्यांना पिळले़ उर्वरित २१ प्रकरणांमध्ये पोलिस, सहकार, कर, महावितरण अशा विविध विभागांनी वेगवेगळ्या कारणास्तव नागरिकांकडून लाच घेतली.

दरम्यान, चालू वर्षातील अजून महिना संपत नाही तापर्यंत आणखी दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले़ ही दोन्ही प्रकरणेही शेतकऱ्यांशी संबंधितच आहेत़ रेशीम शेतीतील कुशल कामाचे बील काढण्यासाठी शेतकऱ्याकडून तांत्रिक सहायकाने ४५०० रुपये घेतले तर परवाच एका तलाठ्याने फेर मंजूर करुन देऊन सातबारा उतारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून १२०० रुपये घेतले़ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेली ही लाचखोरांची भुताटकी अवर्षणकाळातही त्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही़

राज्यात आहे अशी स्थिती़महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांतील लाचखोरी, कारवायांचे अवलोकन केल्यास वरचेवर आकडेवारी वाढतच चालल्याचे दिसते़ २०१० साली ४८६ लाचखोरीचे प्रकरणे उजेडात आली होती़ २०११ मध्ये ४७९, २०१२ मध्ये ४८९, २०१३ मध्ये ५८३ कारवाया झाल्या होत्या़ २०१४ मध्ये त्या दुपटीपेक्षा जास्त वाढून १२४५ वर पोहोचल्या़ २०१५ मध्ये १२३४, २०१६ मध्ये ९८५, २०१७ मध्ये ८७५, तर २०१८ मध्ये ८९१ कारवाया झाल्या आहेत़ 

लाचेची रक्कमही वाढली़राज्यात लाचलुचपतने केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधींची लाच रक्कम पकडली़ २०१८ मध्ये ही रक्कम ४ कोटी ४४ लाख ८ हजार ३७८ रुपये इतकी होती़ २०१७ मध्ये २ कोटी २१ लाख, २०१६ मध्ये २ कोटी ६८ लाख, २०१५ मध्ये २ कोटी ४६ लाख, २०१४ मध्ये २ कोटी ५५ लाख, २०१३ मध्ये १ कोटी ८४ लाख तर २०१२ मध्ये ८० लाख इतकी लाचेची रक्कम पकडण्यात आली़ अगदी अलिकडच्या चार वर्षातील रोकड पाहिल्यास तुलनेने कारवाया कमी होऊनही २०१८ मध्ये तब्बल ४ कोटीहून अधिक रक्कम पकडण्यात आली आहे़

लाचखोरी वाढली की कारवाया ?भ्रष्टाचार, पारदर्शकता अशा मुद्यांवर रान माजवून २०१४ मध्ये रालोआचे सरकार सत्तेत विराजमान झाले़ तेव्हापासून लाचखोरीचे आकडे जवळपास दुपटीने वाढले आहेत़ याचा अर्थ जो तो सोयीने काढू शकतो़ या सरकारच्या काळात लाचखोरी वाढल्याचे निदर्शक हे आकडे असल्याचा एक अर्थ काढता येईल़ तसाच या अर्थाच्या अगदी विरुद्ध लाचखोरांवरील कारवाया वाढविल्याने हे आकडे वाढले, असाही एक अर्थ निघतो़ वस्तुस्थिती काय, हा मात्र संशोधनाचा भाग ठरेल.

टॅग्स :FarmerशेतकरीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस