शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

लाचखोरांची भुताटकी बळीराजाच्या मानगुटीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:27 IST

विश्लेषण : ‘अस्मानी’ संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाचेच्या माध्यमातून ‘सुलतानी’ छळवणूक होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़

- चेतन धनुरे 

अवर्षणाने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी, सामान्यांच्या खिश्यात कडकी निर्माण केलेली असतानाही लाचखोर नोकरदारांचा खिसा मात्र, टम्म फुगताना दिसत आहे़ गेल्या वर्षभरात ३० कारवाया झाल्यानंतरही नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात पुन्हा दोन लाचखोर गळाला लागले़ यातही अवर्षणाप्रमाणेच लाचखोरीची भुताटकी शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर बसलेली अधिक पहायला मिळतेय.

सततच्या अवर्षणाने ‘अस्मानी’ संकटात अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची लाचेच्या माध्यमातून ‘सुलतानी’ छळवणूक होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे़ साल २०१८ मध्ये लाचखोरीची एकूण ३० प्रकरणे उजेडात आली़ यात ४३ लाचखोर जाळ्यात अडकले़ त्यांच्याकडून सुमारे ४ लाख ४८ हजार २०० रुपयांची लाच स्विकारण्यात आली होती़ यात अगदी ५०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत लाच घेण्यात आली होती़ दरम्यान, या तीस कारवायांपैकी ९ कारवाया या शेतकरी, पशुपालकांच्या तक्रारीवरुन झाल्या आहेत़ सातबारा उतारा देण्यासाठी, फेर मंजूर करण्यासाठी, चराई पास देण्यासाठी ते कृषीपंपाला विद्युत जोडणी देण्यापर्यंत वेगवेगळ्या कारणासाठी लाचखोरांनी शेतकऱ्यांना पिळले़ उर्वरित २१ प्रकरणांमध्ये पोलिस, सहकार, कर, महावितरण अशा विविध विभागांनी वेगवेगळ्या कारणास्तव नागरिकांकडून लाच घेतली.

दरम्यान, चालू वर्षातील अजून महिना संपत नाही तापर्यंत आणखी दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले़ ही दोन्ही प्रकरणेही शेतकऱ्यांशी संबंधितच आहेत़ रेशीम शेतीतील कुशल कामाचे बील काढण्यासाठी शेतकऱ्याकडून तांत्रिक सहायकाने ४५०० रुपये घेतले तर परवाच एका तलाठ्याने फेर मंजूर करुन देऊन सातबारा उतारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून १२०० रुपये घेतले़ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेली ही लाचखोरांची भुताटकी अवर्षणकाळातही त्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही़

राज्यात आहे अशी स्थिती़महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांतील लाचखोरी, कारवायांचे अवलोकन केल्यास वरचेवर आकडेवारी वाढतच चालल्याचे दिसते़ २०१० साली ४८६ लाचखोरीचे प्रकरणे उजेडात आली होती़ २०११ मध्ये ४७९, २०१२ मध्ये ४८९, २०१३ मध्ये ५८३ कारवाया झाल्या होत्या़ २०१४ मध्ये त्या दुपटीपेक्षा जास्त वाढून १२४५ वर पोहोचल्या़ २०१५ मध्ये १२३४, २०१६ मध्ये ९८५, २०१७ मध्ये ८७५, तर २०१८ मध्ये ८९१ कारवाया झाल्या आहेत़ 

लाचेची रक्कमही वाढली़राज्यात लाचलुचपतने केलेल्या कारवायांमध्ये कोट्यवधींची लाच रक्कम पकडली़ २०१८ मध्ये ही रक्कम ४ कोटी ४४ लाख ८ हजार ३७८ रुपये इतकी होती़ २०१७ मध्ये २ कोटी २१ लाख, २०१६ मध्ये २ कोटी ६८ लाख, २०१५ मध्ये २ कोटी ४६ लाख, २०१४ मध्ये २ कोटी ५५ लाख, २०१३ मध्ये १ कोटी ८४ लाख तर २०१२ मध्ये ८० लाख इतकी लाचेची रक्कम पकडण्यात आली़ अगदी अलिकडच्या चार वर्षातील रोकड पाहिल्यास तुलनेने कारवाया कमी होऊनही २०१८ मध्ये तब्बल ४ कोटीहून अधिक रक्कम पकडण्यात आली आहे़

लाचखोरी वाढली की कारवाया ?भ्रष्टाचार, पारदर्शकता अशा मुद्यांवर रान माजवून २०१४ मध्ये रालोआचे सरकार सत्तेत विराजमान झाले़ तेव्हापासून लाचखोरीचे आकडे जवळपास दुपटीने वाढले आहेत़ याचा अर्थ जो तो सोयीने काढू शकतो़ या सरकारच्या काळात लाचखोरी वाढल्याचे निदर्शक हे आकडे असल्याचा एक अर्थ काढता येईल़ तसाच या अर्थाच्या अगदी विरुद्ध लाचखोरांवरील कारवाया वाढविल्याने हे आकडे वाढले, असाही एक अर्थ निघतो़ वस्तुस्थिती काय, हा मात्र संशोधनाचा भाग ठरेल.

टॅग्स :FarmerशेतकरीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस