शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटााला प्रत्युत्तर 
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
6
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
7
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
8
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
9
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
10
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
11
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
12
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
13
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
14
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
15
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
16
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
17
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
18
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
19
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
20
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 

अपेक्षा होती ८०० कोटींच्या विम्याची मिळाले ४०७ कोटी; आढेवेढे घेत विमा कंपनी झाली अखेर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 11:40 PM

विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टी व पावसाचा खंड, अशा विचित्र निसर्गयोगाने यावेळी शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यात विमा कंपनीने प्रचंड आढेवेढे घेत अखेरीस ४०७ कोटी रुपये भरपाई देण्याचे निश्चित करून त्याचे वितरण सुरू केले आहे. प्रत्यक्षात ही भरपाई ८०० कोटींच्या घरात असणे अपेक्षित असल्याचा दावा लोकप्रतिनिधींनीनी केलेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यंदा विचित्र निसर्गयोगाचा अनुभव घेतला. आधी पावसाचा दीर्घ खंड व नंतर अतिवृष्टी. या दोन्ही प्रतिकूल स्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, विमा कंपनी हे नुकसान मान्य करण्यास तयार नव्हती. मात्र, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या रेट्यामुळे कंपनी अखेर तयार झाली. विमा कंपनीने नुकसान मान्य करून प्रति हेक्टरी १३ हजार ते १६ हजार ५०० रुपयेपर्यंत भरपाई देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात ही भरपाई जवळपास ८०० कोटींच्या घरात मिळणे अपेक्षित आहे. 

दरम्यान, कंपनीने ३ लाख ४२ हजार४२२ शेतकऱ्यांना पत्र ठरवून त्यांना ४०६.९९ कोटी रुपये विमा मंजूर केला आहे. त्याचे वितरणही सुरू असून, २४९.३५ कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याचे विमा कंपनीने कळविले आहे.

सेना खासदार, आमदारांचा आक्षेप...सेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी या भरपाईवर आक्षेप घेतला आहे. समाजमाध्यमात त्यांनी रात्री उशिरा केलेल्या पोस्टनुसार भरपाई निम्मीच मिळाल्याचे म्हटले आहे. यासाठी त्यांनी केंद्र शासनाच्या एका नोटिफिकेशनला जबाबदार धरले असून, खासदारांनी याबाबत संसदेत तर आमदारांनी न्यायालयीन लढा लढण्याचे संकेत दिले आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी