शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

नरेंद्र मोदी, शहा वगळता भाजपात सर्वच अन्यायग्रस्त; राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 17:41 IST

भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले.

उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित हे दोन नेते वगळता सर्वच अन्यायग्रस्त आहेत, अशी टिप्पणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बांधणीसाठी माजी खासदार शेट्टी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असतानाच माजी खासदार शेट्टी यांनीही मोठे विधान केले. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अवकाळी पावसामुळे आमचा शेतकरी किड्या-मुंग्या प्रमाणे मरत आहे. त्यामुळे आमच्या या प्रश्नांपुढे राज्यातील अन्य प्रश्न गौण आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाना साधला.

महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’मध्ये शेतकरी कर्जमुक्त करणे व थकित वीजबिल माफ करणे या दोन बाबींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सरकारने सदरील दोन्ही निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सोबतच १ रूपया १६ पैसे प्रति युनिट या प्रमाणे कृषी पंपास वीजपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमोल हिप्परगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपाRaju Shettyराजू शेट्टीAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी