शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

नरेंद्र मोदी, शहा वगळता भाजपात सर्वच अन्यायग्रस्त; राजू शेट्टी यांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 17:41 IST

भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले.

उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित हे दोन नेते वगळता सर्वच अन्यायग्रस्त आहेत, अशी टिप्पणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. भाजपात सध्या सुरू असलेल्या ‘ओबीसी’ वादावर त्यांनी उपरोक्त भाष्य केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बांधणीसाठी माजी खासदार शेट्टी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी उस्मानाबादेत आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत असतानाच माजी खासदार शेट्टी यांनीही मोठे विधान केले. दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि अवकाळी पावसामुळे आमचा शेतकरी किड्या-मुंग्या प्रमाणे मरत आहे. त्यामुळे आमच्या या प्रश्नांपुढे राज्यातील अन्य प्रश्न गौण आहेत, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाना साधला.

महाविकास आघाडीच्या ‘कॉमन मिनिमम प्रोग्रॅम’मध्ये शेतकरी कर्जमुक्त करणे व थकित वीजबिल माफ करणे या दोन बाबींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सरकारने सदरील दोन्ही निर्णय घेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. सोबतच १ रूपया १६ पैसे प्रति युनिट या प्रमाणे कृषी पंपास वीजपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमोल हिप्परगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :BJPभाजपाRaju Shettyराजू शेट्टीAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी