शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

केसला घाबरुन नव्हे, ‘सबका विकास’साठी भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 14:47 IST

गेल्या काही वर्षांपासून विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे़

ठळक मुद्देराणा पाटील यांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा शेजारच्याच लातूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रकल्प

उस्मानाबाद : राज्याभरासाठी बहुचचर्चित ठरलेले उस्मानाबादच्या पाटील कुटूंबियांच्या पक्षांतरावर शनिवारी अखेर शिक्कामोर्तब झाले़ राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ़राणा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ही घोषणा जाहीर केली़ ती करताना हत्याकांडाच्या केसला घाबरुन नव्हे तर उस्मानाबादला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पाटील म्हणाले़

शरद पवारांसोबत चार दशकांहून अधिक काळ सावलीसारखे उभे राहणाऱ्या या कुटूंबाने ‘ते आदरणीय होते, आहेत व राहतील’ असे सांगत त्यांची साथ सोडली़ डॉ़पद्मसिंह पाटील व आ़ राणा पाटील यांनी शनिवारी उस्मानाबादेत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ यावेळी राष्ट्रवादीतील काही पदाधिकारीही त्यांच्यासमवेत मंचावर उपस्थित होते़ प्रारंभी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्यानंतर आ़ राणा पाटील यांनी संवाद साधला़ ते म्हणाले, उस्मानाबादसाठी डॉ़पाटील यांनी काय केलं, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही़ मात्र, गेल्या काही वर्षांपासून विकासाची प्रक्रियाच ठप्प झाली आहे़ कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे पाणी अजून मिळाले नाही़ कौडगाव एमआयडीसीत उद्योग आले नाहीत़ दुसरीकडे शेजारच्याच लातूर, सोलापूर जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ झाली़ देश एकिकडे ‘सबका साथ, सबका विकास’च्या प्रवाहात असताना, उस्मानाबाद यात मागे राहू नये, म्हणून काळजावर दगड ठेवत हा पक्षांतराचा निर्णय घेत असल्याचे सांगून आ़पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली़ सध्या राजकारणात सक्रीय नसले तरी डॉ़पद्मसिंह पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते़ अखेरीस त्यांनी पुत्र राणा पाटील व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयास आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगितले़

आमच्या सत्ताकाळातही संघर्षचराणा पाटील यांनी सत्तासंघर्षाची पदर उलगडून सांगताना आपण मंत्री राहिलो तरी तेव्हाही मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे सांगितले़ कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याची योजना डॉ़पाटलांनी मंजूर करुन घेतली होती़ त्यास २० वर्षे उलटल्यानंतरही हे पाणी आपल्याकडे येऊ शकले नाही़ मी मंत्री राहिलो असलो तरी, संघर्षच करावा लागत होता, अशी शब्दांत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्यामागचे हेही एक अंतर्गत कारण स्पष्ट केले़

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाOsmanabadउस्मानाबाद