शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अल निनोमुळे जलसाठ्यांवर प्रभाव पडणार; धाराशिव जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 24, 2023 19:01 IST

या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे.

धाराशिव : अल निनोच्या प्रभावामुळे जलसाठे वेगाने खालावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. याची धास्ती जिल्हा प्रशासनाने आतापासून घेतली असून, १ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाकडून  १४ कोटी ४५ लाखांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 

या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे. या संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी संस्था सरसावल्या आहेत. त्यानुसार जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडून ९ कोटी ५१ लाख ६६ हजारांचा कृती आराखडा तयार केला आहे, तर नगर विकास विभागाकडून शहरी भागाकरिता ५ कोटी ३ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. आराखड्यात ग्रामीण भागात टंचाई निवारणासाठी अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर भर दिला आहे, तर शहरी भागात पाणी पुरवठा योजना कामे, विंधन विहिरी, कूपनलिका घेणे, विंधन विहिरी दुरुस्ती, जनावराकरिता पाणवठे अशी कामे असणार आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादWaterपाणीRainपाऊस