उस्मानाबादेत बारा दिवसांत आठ वकिलांचा काेराेनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST2021-04-30T04:41:12+5:302021-04-30T04:41:12+5:30

उस्मानाबाद -जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या महामारीचे शिकार न्यायालयात आपल्या पक्षकारांची कायदेशीर बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून ...

Eight lawyers killed in 12 days in Osmanabad | उस्मानाबादेत बारा दिवसांत आठ वकिलांचा काेराेनाने मृत्यू

उस्मानाबादेत बारा दिवसांत आठ वकिलांचा काेराेनाने मृत्यू

उस्मानाबाद -जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या महामारीचे शिकार न्यायालयात आपल्या पक्षकारांची कायदेशीर बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून देणारे वकीलही ठरू लागले आहेत. मागील दहा ते बारा दिवसांत जिल्ह्यातील आठ निष्णात वकिलांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. घरातील कर्ते व्यक्ती गेल्याने कुटुंबियांसह पक्षकार आणि त्यांच्याकडे न्यायिक लढ्याचे धडे गिरविणार्या वकिलांवर दुखाचा डाेंगर काेसळला आहे. संबंधित वकिलांच्या कुटुंबियांना बार काैन्सिलकडून लाखाची मदत केली जाते. परंतु, शासनाकडून दमडीही मिळत नाही.

उस्मानाबाद येथील जिल्हा न्यायालयामध्ये फाैजदारी प्रकरणात आराेपींची बाजू भक्कमपणे मांडण्यात ज्यांचा हातखंडा हाेता, असे ज्येष्ठ वकील दत्तात्रय सिद्राम बारखडे-पाटील (वय ६२) यांचे २१ एप्रिल राेजी निधन झाले. यानंतर जिल्हा विधिज्ञ मंडळाचे माजी पदाधिकारी ॲड. नारायण वडणे (वय ४५) यांना घश्याचा त्रास सुरू झाल्यानंतर तातडीने रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तसेच ॲड.बापूसाहेब विठ्ठलराव गंजे व ॲड. विनाेद गंगावणे यांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. त्याचप्रमाणे जिल्हा न्यायालयातील निष्णात महिला वकील म्हणून ओळख असलेल्या भारती राेकडे यांचे २७ एप्रिल राेजी सकाळी काेराेनानेच निधन झाले. उमरगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील वकील रविंद्र बिराजदार यांनाही काेराेनाचा संसर्ग झाला हाेता. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यांच्यासाेबतच ॲड. राम कुलकर्णी, ॲड. सत्यनारायण दंडनाईक हेही दाेघे काेराेनामुळे दगावले.

चाैकट...

वकिलांसाठी कसल्याही स्वरूपाचे सुरक्षा कवच नाही. त्यांच्या पश्चात वारसांना कसलीही सुरक्षा नाही. वकिलांचा संपर्क थेट पक्षकारांशी येताे. त्यामुळे वकिलांमध्येही काेराेना संसर्ग अधिक आहे. जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांत ८ वकिलांचा मृत्यू काेराेनामुळे झाला आहे. अनेक वकिलांचे नातेवाईकही यात बळी पडले आहेत. त्यामुळे काेराेनामुळे दगावलेल्या वकिलांच्या वारसांना शासनाने मदत करण्याची आवश्यकता आहे. शासनाने वकिलांच्या सारसांना तात्काळ २५ लाखांची मदत करावी.

-ॲड. नितीन भाेसले, अध्यक्ष जिल्हा विधिज्ञ मंडळ, उस्मानाबाद.

Web Title: Eight lawyers killed in 12 days in Osmanabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.