शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पावसाच्या उघडीपमुळे बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

देवधानोरा/रांजणी/नंदगाव : जिल्हाभरात पावसाने उघडीप दिल्यामुळे बहरात आलेली खरीप पिके आता संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी माना टाकत असून, काही ...

देवधानोरा/रांजणी/नंदगाव : जिल्हाभरात पावसाने उघडीप दिल्यामुळे बहरात आलेली खरीप पिके आता संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी माना टाकत असून, काही ठिकाणी सुरळीत विजेअभावी उपलब्ध पाणीही पिकांना देत येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

कळंब तालुक्यातील देवधानोरा परिसरात मागील १५ दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनच्या पिकास लागलेली फुले आणि शेंगा पाण्याअभावी वाळून जात आहेत. सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने अनेक कापूस व ऊस उत्पादक शेतकरीही सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. मात्र, १५ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर करत तुषार सिंचनाच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, यातही योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाणी असूनही पीक सुकून जात आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरू असून अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने परिसरातील नदी नाले तलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, कळंब तालुक्यातील रांजणी परिसरात देखील पावसाअभावी पिकांची स्थिती चिंताजनक बनली असून, लवकर पाऊस न झाल्यास पिके हातची जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चौकट.......

...तर पिके हातची जाण्याची भीती

तुळजापूर तालुक्यातील नंदगावसह बोरगाव, सिंदगाव, लोहगाव, सलगरा मड्डी, कुनसावळी, बोळेगाव या परिसरात पावसाअभावी खरीप पिकांसह सोयाबीन धोक्यात आले आहे. सध्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी मार्केटमध्ये सोयाबीनला ११ हजार २०० तर लातूर मार्केटमध्ये १० हजार ८०० रुपये दर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनवर अनेक स्वप्ने रंगविली. मात्र, पावसाअभावी पीक संकटात सापडले आहे. दोन-तीन दिवसात पाऊस नाही झाल्यास पीक हातचे जाण्याची भीती शेतकरी दशरथ काटे, परमेश्वर बेट्टी, माजी उपसरपंच कमलाकर तुप्पे, धुळप्पा कलशेट्टी, सर्वानंद चिनगुंडे, दत्तात्रय पांचाळ, चंद्रकांत मडोळे, तम्मा कांबळे, दासू राठोड, सातलिंगप्पा करंडे, साधू वाघमारे, हुवान्ना गुड्डे आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.