शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

पावसाच्या उघडीपमुळे बळीराजा हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:36 IST

देवधानोरा/रांजणी/नंदगाव : जिल्हाभरात पावसाने उघडीप दिल्यामुळे बहरात आलेली खरीप पिके आता संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी माना टाकत असून, काही ...

देवधानोरा/रांजणी/नंदगाव : जिल्हाभरात पावसाने उघडीप दिल्यामुळे बहरात आलेली खरीप पिके आता संकटात सापडली आहेत. पाण्याअभावी माना टाकत असून, काही ठिकाणी सुरळीत विजेअभावी उपलब्ध पाणीही पिकांना देत येत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

कळंब तालुक्यातील देवधानोरा परिसरात मागील १५ दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनच्या पिकास लागलेली फुले आणि शेंगा पाण्याअभावी वाळून जात आहेत. सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने अनेक कापूस व ऊस उत्पादक शेतकरीही सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. मात्र, १५ दिवसापासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर करत तुषार सिंचनाच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, यातही योग्य दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाणी असूनही पीक सुकून जात आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरू असून अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने परिसरातील नदी नाले तलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे भविष्यात पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, कळंब तालुक्यातील रांजणी परिसरात देखील पावसाअभावी पिकांची स्थिती चिंताजनक बनली असून, लवकर पाऊस न झाल्यास पिके हातची जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चौकट.......

...तर पिके हातची जाण्याची भीती

तुळजापूर तालुक्यातील नंदगावसह बोरगाव, सिंदगाव, लोहगाव, सलगरा मड्डी, कुनसावळी, बोळेगाव या परिसरात पावसाअभावी खरीप पिकांसह सोयाबीन धोक्यात आले आहे. सध्या अक्कलकोट तालुक्यातील दुधनी मार्केटमध्ये सोयाबीनला ११ हजार २०० तर लातूर मार्केटमध्ये १० हजार ८०० रुपये दर आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनवर अनेक स्वप्ने रंगविली. मात्र, पावसाअभावी पीक संकटात सापडले आहे. दोन-तीन दिवसात पाऊस नाही झाल्यास पीक हातचे जाण्याची भीती शेतकरी दशरथ काटे, परमेश्वर बेट्टी, माजी उपसरपंच कमलाकर तुप्पे, धुळप्पा कलशेट्टी, सर्वानंद चिनगुंडे, दत्तात्रय पांचाळ, चंद्रकांत मडोळे, तम्मा कांबळे, दासू राठोड, सातलिंगप्पा करंडे, साधू वाघमारे, हुवान्ना गुड्डे आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.