केंद्र सरकारमुळेच ओबीसीसह मराठा समाजाचे आरक्षण गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST2021-07-26T04:29:45+5:302021-07-26T04:29:45+5:30

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने ...

Due to the central government, the reservation of Maratha community including OBCs went away | केंद्र सरकारमुळेच ओबीसीसह मराठा समाजाचे आरक्षण गेले

केंद्र सरकारमुळेच ओबीसीसह मराठा समाजाचे आरक्षण गेले

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने आरक्षण मिळवून न दिल्यास आगामी निवडणुकीत हा समाज त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उस्मानाबादेत २४ जुलै राेजी ओबीसी आरक्षण बचाव जागर मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर आ. राजेश राठोड, बाळासाहेब सानप, राजाभाऊ मुंडे, नवनाथ पडळकर, रामराव वडकुते, प्रा. सुशीलाताई मोराळे, शिवानंद कथले, धनंजय ओंबासे, सुखदेव भालेकर, खलिफा कुरेशी, रंगनाथ दुधाळ, लक्ष्मण माने, धनंजय राऊत, रवी कोरे, पांडुरंग लाटे, सोमनाथ गुरव, बाबा मुजावर, इम्तिहान बागवान, डॉ. नवनाथ दुधाळ, शरद कोळी, सोमनाथ काशीद, अरुण खरमाटे, प्रकाश राठोड, बबनराव तायवाडे, राजेंद्र राख, बाळासाहेब पांचाळ, अक्षय ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

बोरकर म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा आयोगाने अहवाल दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. तर तत्कालीन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १६ खासदारांच्या समितीने ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, असा अहवाल दिला होता. मात्र याची अंमलबजावणी केली नसून त्या सर्व अहवालास केराची टोपली दाखवली आहे. भाजपची मंडळी अतिशय बुद्धिमान व हुशार असून ती दिलेल्या शब्दाला प्रमाण मानणारी आहे. मग ओबीसी आरक्षणाचा शब्द गेला कुठे? असा परखड सवालही त्यांनी भाजपाला केला. ओबीसी घटकांतील बारा बलुतेदाराप्रमाणेच भाजपाने सर्वात जास्त नुकसान मराठा समाजाचेही केले आहे. त्यांना नोकरी, धंदा नाही. मग त्यांनी करायचे काय, असा सवाल करीत केंद्रातील भाजपा सरकारने आरक्षण पूर्ववत करावे. अन्यथा २०२४ च्या निवडणुकीत समाजबांधव त्यांना जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही दिला. यावेळी प्रा. सुशीलाताई माेराळे यांनीही मत मांडले. १९३१ साली इंग्रजांनी ओबीसींची जनगणना केली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये ३४० कलम घातले नसते तर ओबीसींना अजिबातच आरक्षण मिळाले नसते. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे डोंगराएवढे ओबीसी समाजावर उपकार आहेत. तसेच ७ ऑगस्ट १९९० ला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यामुळे प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. ओबीसी समाजाची बाजू घेणाऱ्या नेतेमंडळींना भाजपच्या मंडळींनी तुरुंगात डांबण्याचे काम केले आहे. ओबीसींना खरा न्याय देण्याचे शेवटचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. १५ ऑगस्टला गावागावात ओबीसी आरक्षण संदर्भात मेळावे घेऊन ग्रामसभा, नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ठराव पारित करून सरकारवर दबाव तंत्राचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डाॅ. नवनाथ दुधाळ, सुखदेव भालेकर, शरद कोळी, राजेंद्र राख, बालाजी शिंदे रामराव वडकुते, दादासाहेब मुंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष शिवानंद कथले यांनी तर सूत्रसंचालन पांडुरंग लाटे यांनी व उपस्थितांचे आभार डॉ. नवनाथ पडळकर यांनी मानले. या जागर मेळाव्यास जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Due to the central government, the reservation of Maratha community including OBCs went away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.