शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

शिंदेंच्या मंत्रिमंडळात दुष्काळी उस्मानाबादला दोन पदांची आस; एक नाव तर फिक्सच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 15:59 IST

दुष्काळी जिल्ह्यात मंत्रिपदांची लॉटरी लागण्याची चिन्हे

- चेतन धनुरेउस्मानाबाद : नैसर्गिक अन् राजकीयदृष्ट्याही दुष्काळी गणल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याची नव्या सरकारात लॉटरी लागण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे यातील एकाचे तर मंत्रिपद जवळपास फिक्स आहेच. आता दुसरे मंत्रिपद हे दुसऱ्या आमदाराच्या पदरी पडणार की भाजप आमदाराची लॉटरी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा अपवाद वगळता आजवर जिल्ह्याला एकही महत्त्वाचे खाते असलेले मंत्रिपद मिळाले नाही. मागच्या टर्मला चारपैकी तीन आमदार हे विरोधी पक्षातील होते. एकमेव आमदार ज्ञानराज चौगुले हे सत्ता पक्षातील राहिले. मात्र, त्यांनाही संधी मिळाली नाही. यावेळच्या निवडणुकीत तीन आमदार शिवसेनेचे, तर एक भाजपचा निवडून आला. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत जिल्ह्याला एक तरी मंत्रिपद मिळेल, अशी आशा होती, ती फोल ठरली. यामुळे दुखावले गेलेले सेनेचे आमदार तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांची साथ दिली.

यातही तानाजी सावंत हे आघाडीवर होते. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे आमदार चौगुले हेही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यातील ताईत आहेत. सलग तीन वेळा निवडून आलेले चौगुले हे उद्धव ठाकरे यांचा शब्द ओलांडून शिंदे यांच्या प्रेमापोटी बंडात सहभागी होतात यातच सर्वकाही आले. त्यामुळे त्यांचेही पारडे जड आहे. मात्र, ऐनवेळी दोघांपैकी एकाला संधी देण्याचे ठरल्यास चौगुले यांच्याकडे महामंडळ वा तत्सम जबाबदारी या टर्ममध्ये सोपविली जाण्याची शक्यता अधिक आहे.

भाजपच्या आशेला पालवी...मागच्या टर्मपर्यंत जिल्ह्यात भाजपचा एकही विधानसभा आमदार नव्हता. ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांना पक्षात आणून त्यांना तुळजापूरहून निवडणूक लढविण्यास प्रेरित केले. येथील काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकरराव चव्हाण यांना पराभूत करीत पाटील यांनी विजय मिळविला. भाजपला जिल्ह्यात संघटनेचा विस्तार करायचा आहे. त्यामुळे येथे मंत्रिपद देणे अत्यावश्यक ठरते. यातूनच राणाजगजितसिंह पाटील यांचे पारडे जड ठरते आहे. परिणामी, जिल्ह्यात किमान दोन मंत्रिपदे येण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस