शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्च्युनर घ्यायची म्हणून राजकारणात येऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : तरुणांनो राजकारणात जरूर या; पण येताना सेवाव्रती भाव ठेवून या. त्यापूर्वी भाई उद्धवराव पाटील यांचे जीवनकार्य, त्यांची ...

उस्मानाबाद : तरुणांनो राजकारणात जरूर या; पण येताना सेवाव्रती भाव ठेवून या. त्यापूर्वी भाई उद्धवराव पाटील यांचे जीवनकार्य, त्यांची तत्त्वे अभ्यासून घ्या. तरच आपल्याला भविष्य आहे, अन्यथा दोन वर्षांत फॉर्च्युनर घ्यायची म्हणून राजकारणात येणार असाल तर लगेच संपून जाल. व्यक्तिगत हिताचे राजकारण टिकत नाही, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी गुरुवारी येथे केले.

शेकाप नेते भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी उस्मानाबादेत आ. पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर होते. आ. संजय शिंदे, आदित्य धनंजय पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवार म्हणाले, भाई आयुष्यभर शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढले. त्यासाठी त्यांनी जी तत्त्वे अंगीकारली होती, त्यास कधीही तडा जाऊ दिला नाही. एखादा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात जाणार असेल तर भाई बोलायचे, लढायचे. लातूरच्या एका अधिवेशनात त्यांनी फुलचंद गांधी यांनी सावकारकी सोडावी म्हणून जोरदार आग्रह धरला होता. विरोध दर्शविला होता. भाईंची विरोधाची पद्धत अन् पटवून देण्याची क्षमता पाहून फुलचंद गांधी यांनी तेथेच सावकारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. अगदी याच पद्धतीने आताही अशा चळवळींची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. अर्णब गोस्वामींच्या चॅटमधून अनेक गंभीर बाबी समोर आल्या; पण त्यावर चर्चा केली जात नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावर चर्चा होत नाही. सामान्यांच्या हिताविरोधात एखादा निर्णय झाल्यास आपण बोलले पाहिजे. खरा राष्ट्रवाद हाच आहे; पण हल्ली पाकिस्तानविरोधात बोलले की राष्ट्रवाद, असे रुजविले जात आहे, जे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले. याच कार्यक्रमात कोरोना काळात उत्तम सेवा बजावणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

भाईंची मांडणी शेतकरी हिताची -जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अध्यक्षीय समारोपात भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याचे विविधांगी संदर्भ देत तरुणांनी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. आजच्या जगण्यातील पेच ओळखायला यायला हवे. तरुणांनी हे पेच समजून घेत त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाईंनी त्यांच्या काळातील असेच पेच, कष्ट ओळखून ते सोडविण्यासाठी आयुष्य वाहून घेतले. वैचारिक मांडणीला कृतिशीलतेची जोड देऊन शेतकरी कसा समृद्ध होईल, याचाच विचार केला. तोच विचार अन् तीच चळवळीची परंपरा आपण पुढे नेली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.