शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्च्युनर घ्यायची म्हणून राजकारणात येऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : तरुणांनो राजकारणात जरूर या; पण येताना सेवाव्रती भाव ठेवून या. त्यापूर्वी भाई उद्धवराव पाटील यांचे जीवनकार्य, त्यांची ...

उस्मानाबाद : तरुणांनो राजकारणात जरूर या; पण येताना सेवाव्रती भाव ठेवून या. त्यापूर्वी भाई उद्धवराव पाटील यांचे जीवनकार्य, त्यांची तत्त्वे अभ्यासून घ्या. तरच आपल्याला भविष्य आहे, अन्यथा दोन वर्षांत फॉर्च्युनर घ्यायची म्हणून राजकारणात येणार असाल तर लगेच संपून जाल. व्यक्तिगत हिताचे राजकारण टिकत नाही, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी गुरुवारी येथे केले.

शेकाप नेते भाई उद्धवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी उस्मानाबादेत आ. पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर होते. आ. संजय शिंदे, आदित्य धनंजय पाटील यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवार म्हणाले, भाई आयुष्यभर शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढले. त्यासाठी त्यांनी जी तत्त्वे अंगीकारली होती, त्यास कधीही तडा जाऊ दिला नाही. एखादा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात जाणार असेल तर भाई बोलायचे, लढायचे. लातूरच्या एका अधिवेशनात त्यांनी फुलचंद गांधी यांनी सावकारकी सोडावी म्हणून जोरदार आग्रह धरला होता. विरोध दर्शविला होता. भाईंची विरोधाची पद्धत अन् पटवून देण्याची क्षमता पाहून फुलचंद गांधी यांनी तेथेच सावकारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. अगदी याच पद्धतीने आताही अशा चळवळींची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. अर्णब गोस्वामींच्या चॅटमधून अनेक गंभीर बाबी समोर आल्या; पण त्यावर चर्चा केली जात नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यावर चर्चा होत नाही. सामान्यांच्या हिताविरोधात एखादा निर्णय झाल्यास आपण बोलले पाहिजे. खरा राष्ट्रवाद हाच आहे; पण हल्ली पाकिस्तानविरोधात बोलले की राष्ट्रवाद, असे रुजविले जात आहे, जे चुकीचे आहे, असेही पवार म्हणाले. याच कार्यक्रमात कोरोना काळात उत्तम सेवा बजावणाऱ्या नागरिक, कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

भाईंची मांडणी शेतकरी हिताची -जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अध्यक्षीय समारोपात भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याचे विविधांगी संदर्भ देत तरुणांनी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. आजच्या जगण्यातील पेच ओळखायला यायला हवे. तरुणांनी हे पेच समजून घेत त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भाईंनी त्यांच्या काळातील असेच पेच, कष्ट ओळखून ते सोडविण्यासाठी आयुष्य वाहून घेतले. वैचारिक मांडणीला कृतिशीलतेची जोड देऊन शेतकरी कसा समृद्ध होईल, याचाच विचार केला. तोच विचार अन् तीच चळवळीची परंपरा आपण पुढे नेली पाहिजे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.