शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

‘एमबीबीएस’धारक डाॅक्टर देता का डाॅक्टर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:59 AM

उस्मानाबाद : मध्यंतरी काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्व काही सुरळीत हाेऊ लागले आहे, असे वाटत असतानाच पुन्हा काेराेना विषाणूने डाेके ...

उस्मानाबाद : मध्यंतरी काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्व काही सुरळीत हाेऊ लागले आहे, असे वाटत असतानाच पुन्हा काेराेना विषाणूने डाेके वर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेऊ लागली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील आराेग्य यंत्रणेवर ताण येत आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद आराेग्य केंद्रातील ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘एबीबीएस’धारक डाॅक्टर देता का डाॅक्टर, असे म्हणण्याची वेळ आता खुद्द जिल्हा आराेग्य यंत्रणेवर येऊन ठेपली आहे.

काेराेनाचा उद्रेक वाढल्यानंतर शासनाने आराेग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. या माध्यमातून भाैतिक सुविधा वाढल्या. उपकेंद्रांना ‘बीएएमएस’धारक डाॅक्टरही देण्यात आले आहेत. परंतु, दुसरीकडे ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रांसाठी दाेन या प्रमाणे ८२ ते ८३ जागा मंजूर आहेत. काही वर्षांपूर्वी या जागा फुलफिल हाेत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आराेग्य सेवा मिळत हाेती. मात्र, ऐन काेराेना संकटाच्या काळात डाॅक्टरांची वानवा निर्माण झाली आहे. ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या तब्बल ५० टक्के जागा रिक्त आहेत. याचा आराेग्य सेवेवर विपरित परिणाम हाेऊ लागला आहे. यातून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आराेग्य विभागाने अनेक ठिकाणी एक एमबीबीसधारक व एक ‘बीएएमएस’धारक डाॅक्टर दिले आहेत. तरीही डाॅक्टरांची संख्या कमी पडत आहे. काही आराेग्य केंद्रांना एकही एमबीबीएसधारक डाॅक्टर नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी एखाद्या दगावलेल्या व्यक्तीस पाेस्टमार्टेमसाठी आणल्यास अनंत अडचणींना ताेंड द्यावे लागते. लगतच्या आराेग्य केंद्रातील डाॅक्टरांना पाचारण करावे लागते. अनेकवेळा नातेवाईकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. अशावेळी शाब्दिक खटकेही उडतात. त्यामुळे वेळीच डाॅक्टर भरण्याची गरज आहे.

चाैकट...

जिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी आपल्या मतदार संघातील प्राथमिक आराेग्य केंद्रास ‘एमबीबीएस’ डाॅक्टर मिळावेत, यासाठी आग्रही आहेत. परंतु, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. वडगावे यांच्याकडेही अन्य पर्याय नाहीत. दरम्यान, सध्या काही सदस्यांनी प्रत्येक आराेग्य केंद्रात एक ‘एमबीबीएस’ व दुसरे ‘बीएएमएस’डाॅक्टर द्यावेत, अशी सूचना मांडली आहे. ज्यामुळे डाॅक्टरांची चणचण कमी हाेईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावरही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले.

काेट...

‘एमबीबीएस’ डाॅक्टर मिळावेत, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नेहमी पत्रव्यवहार केला जात आहे. संबंधित डाॅॅक्टर उपलब्ध हाेताच, नियुक्ती देण्यात येईल.

-डाॅ. हणमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.