शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला उद्योगधंदे दिले, आता कर्नाटकला गावे देतील: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:53 IST

सीमावर्ती भागातील वाद, भाजपने रचलेले षडयंत्र असल्याचा हल्लाबोल उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला

उस्मानाबाद : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मंगळवारी जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. मात्र, या सगळ्या वादामागे भाजप असून, त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी उस्मानाबादेत केला.

प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने उस्मानाबादेत आलेल्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, गुजरातच्या निवडणुका होत्या तेव्हा येथील उद्योगधंदे भाजपने गुजरातला जाऊ दिले. आता लवकरच कर्नाटक राज्याच्या निवडणुका लागणार आहेत. अशावेळी सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात जाऊ द्यायची, असा भाजपचा डाव आहे. यासाठीच ते मिळून सीमेवर वाद पेटवीत आहेत. यामागे मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचाही डाव आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा. ज्यामुळे भविष्यात येथे उद्योग येण्यास धजावणार नाहीत. येथील लोक महागाई, बेरोजगारी यासारख्या विषयांवर प्रश्न विचारणार नाहीत, असा महाराष्ट्र या भाजपवाल्यांना बनवायचा आहे. त्यामुळे ते असे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

मनसेला इशारामनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने अंधारे यांच्या सभा उधळून लावण्याचा इशारा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याने दिला होता. यावर त्या म्हणाल्या, माझी एक सभा झालीही. आणखी दोन सभा जिल्ह्यात होत आहेत. करून दाखवा. इलाका तुम्हारा हो तो धमाका हमारा है, अशा शब्दांत मनसेचा इशारा त्यांनी धुडकावून लावला. यावेळी खा. ओम राजेनिंबाळकर, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा