शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला उद्योगधंदे दिले, आता कर्नाटकला गावे देतील: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:53 IST

सीमावर्ती भागातील वाद, भाजपने रचलेले षडयंत्र असल्याचा हल्लाबोल उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला

उस्मानाबाद : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मंगळवारी जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. मात्र, या सगळ्या वादामागे भाजप असून, त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी उस्मानाबादेत केला.

प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने उस्मानाबादेत आलेल्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, गुजरातच्या निवडणुका होत्या तेव्हा येथील उद्योगधंदे भाजपने गुजरातला जाऊ दिले. आता लवकरच कर्नाटक राज्याच्या निवडणुका लागणार आहेत. अशावेळी सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात जाऊ द्यायची, असा भाजपचा डाव आहे. यासाठीच ते मिळून सीमेवर वाद पेटवीत आहेत. यामागे मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचाही डाव आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा. ज्यामुळे भविष्यात येथे उद्योग येण्यास धजावणार नाहीत. येथील लोक महागाई, बेरोजगारी यासारख्या विषयांवर प्रश्न विचारणार नाहीत, असा महाराष्ट्र या भाजपवाल्यांना बनवायचा आहे. त्यामुळे ते असे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

मनसेला इशारामनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने अंधारे यांच्या सभा उधळून लावण्याचा इशारा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याने दिला होता. यावर त्या म्हणाल्या, माझी एक सभा झालीही. आणखी दोन सभा जिल्ह्यात होत आहेत. करून दाखवा. इलाका तुम्हारा हो तो धमाका हमारा है, अशा शब्दांत मनसेचा इशारा त्यांनी धुडकावून लावला. यावेळी खा. ओम राजेनिंबाळकर, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा