शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर गुजरातला उद्योगधंदे दिले, आता कर्नाटकला गावे देतील: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:53 IST

सीमावर्ती भागातील वाद, भाजपने रचलेले षडयंत्र असल्याचा हल्लाबोल उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला

उस्मानाबाद : महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मंगळवारी जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे. मात्र, या सगळ्या वादामागे भाजप असून, त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी उस्मानाबादेत केला.

प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने उस्मानाबादेत आलेल्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, गुजरातच्या निवडणुका होत्या तेव्हा येथील उद्योगधंदे भाजपने गुजरातला जाऊ दिले. आता लवकरच कर्नाटक राज्याच्या निवडणुका लागणार आहेत. अशावेळी सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातील गावे कर्नाटकात जाऊ द्यायची, असा भाजपचा डाव आहे. यासाठीच ते मिळून सीमेवर वाद पेटवीत आहेत. यामागे मुख्य प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचाही डाव आहे. महाराष्ट्र अस्थिर करायचा. ज्यामुळे भविष्यात येथे उद्योग येण्यास धजावणार नाहीत. येथील लोक महागाई, बेरोजगारी यासारख्या विषयांवर प्रश्न विचारणार नाहीत, असा महाराष्ट्र या भाजपवाल्यांना बनवायचा आहे. त्यामुळे ते असे षडयंत्र रचत असल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

मनसेला इशारामनसे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने अंधारे यांच्या सभा उधळून लावण्याचा इशारा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्याने दिला होता. यावर त्या म्हणाल्या, माझी एक सभा झालीही. आणखी दोन सभा जिल्ह्यात होत आहेत. करून दाखवा. इलाका तुम्हारा हो तो धमाका हमारा है, अशा शब्दांत मनसेचा इशारा त्यांनी धुडकावून लावला. यावेळी खा. ओम राजेनिंबाळकर, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, संपर्कप्रमुख शंकरराव बोरकर व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा