शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:35 IST

शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करीत ‘शक्तीपीठ मार्ग रद्द करावा’, अशी मागणी केली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

तामलवाडी (जि. धाराशिव) : नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ मार्गाच्या जमीन संपादनासाठी आलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर संयुक्त जमीन मोजणीवेळी पोलिस व शेतकऱ्यांत झटापट झाली. यात सहा शेतकऱ्यांसह एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी शिवारात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. संयुक्त जमीन मोजणी विरोधावर शेतकरी ठाम असल्याने अखेर प्रशासनाला मोजणी प्रक्रिया थांबवावी लागली.

नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी, खुंटेवाडी, महसूल विभागातील गावच्या शिवारातून मार्गस्थ होत आहे. यासाठी भूसंपादनाच्या कार्यवाही महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवारी वाणेवाडी शिवारातील गट नं. २४३ मधील जमीन मोजणी उप विभागीय अधिकारी देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात येणार होती. मात्र, यावेळी  वाणेवाडी, शेळगाव, खुंटेवाडी, रुई आदी गावच्या शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करीत ‘शक्तीपीठ मार्ग रद्द करावा’, अशी मागणी केली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. 

शेतकरी व पोलिसांत बाचाबाचीदरम्यान, बुधवारी पुन्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी संयुक्त मोजणीसाठी दाखल झाले. उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात येत होती. दरम्यान, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शेतकरी व पोलिसांत बाचाबाची सुरू झाली. यावेळी झालेल्या झटापटीत भाजपा तालुकाध्यक्ष महादेव जाधव, दत्तात्रय सावंत, प्रदीप जाधव, गणेश जाधव, माणिक गायकवाड, दिलीप शिरसट हे सहा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. याच वेळी शेतकरी दत्तात्रय सावंत यांना मायनर अटॅक आल्याने, ते जमिनीवर कोसळले. ‘शेतातून पोलिस व प्रशासनाचे अधिकारी निघून जात नाहीत तोवर उपचारासाठी दवाखान्यात जाणार नाही’ अशी भूमीका या शेतकऱ्याने घेतली आहे.

आम्हाला शक्तीपीठ मार्ग नकोचखुंटेवाडी, काटी गावच्या शिवारातून यापूर्वीच सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग गेला आहे, त्यासाठी जमिनी संपादीत झाल्या आहेत. आता पुन्हा शक्तीपीठ मार्गासाठी जमीन घेतल्यास शेतकऱ्यांकडील जमिनीचे क्षेत्र आणखी कमी होईल. यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी 'शक्तीपीठ मार्गच रद्द करा' या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले.

तगडा बंदोबस्तशक्तीपीठ मार्गाच्या भूसपांदनास शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामलवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने ३० पोलिस कर्मचारी, ४ अधिकारी वाणेवाडी शिवारात बंदोबस्तासाठी आले होते. बार्शी, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनीही मोजणी ठिकाणी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गdharashivधाराशिवFarmerशेतकरीagitationआंदोलन