शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; महामार्ग राेखला अन् मेंढ्याही साेडल्या !

By बाबुराव चव्हाण | Updated: September 26, 2023 17:47 IST

संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून ‘‘सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही’’, अशा शब्दात सरकाला गर्भित इशाराही दिला.

धाराशिव : ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं’,‘यळकोट यळकोट जय मल्हार’,‘ना नेता, ना पक्ष, धनगर आरक्षण हेच लक्ष’ अशा घाेषणा देत मंगळवारी धनगर बांधवांच्या वतीने ‘एसटी’ आरक्षणाच्या मागणीसाठी चाेराखळी पाटी येथे साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग राेखला. संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून ‘‘सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही’’, अशा शब्दात सरकाला गर्भित इशाराही दिला.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजबांधवांच्या वतीने चाैंढी येथे आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी साेलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील चाेराखळी पाटी येथे धनगर बांधवांच्या वतीने रास्ताराेकाे आंदाेलन करण्यात आले. यानंतर संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून सरकारच्या भूमिकेचा निषेध नाेंदविला. धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे, यासाठी मागील ७० वर्षांपासून संघर्ष करीत आहाेत. मात्र, सरकारने प्रत्येकवेळी आश्वासन देण्यापलीकडे काहीच केले नाही. प्रत्येकवेळी आश्वासनावर बाेळवण केली. आम्ही सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही, असा इशाराही यावेळी धनगर बांधवांनी दिला. दरम्यान, आंदाेलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली हाेती.

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणOsmanabadउस्मानाबाद