वाहनांच्या धडकेत हरणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:32 IST2021-04-21T04:32:17+5:302021-04-21T04:32:17+5:30
जेवळी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढली आहे. शेतशिवारात पाणी नसल्याने अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे ...

वाहनांच्या धडकेत हरणाचा मृत्यू
जेवळी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता वाढली आहे. शेतशिवारात पाणी नसल्याने अनेक वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येत आहेत. दक्षिण जेवळी येथील १३३ केव्ही उपकेंद्रासमोर असलेल्या राज्य महामार्ग क्रमांक २११ वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. याच ठिकाणी सोमवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एक गरोदर हरिणी रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनांच्या धडकेत गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. यावेळी तेथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते महादेव कारभारी व अतुल बनसोडे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या हरणाला बाजूला घेऊन प्राथमिक उपचार केले, भोसगा येथील वनविभागाला घटनेची माहिती कळविली. मात्र, उपचार होईपर्यंत हरणाचा मृत्यू झाला.
वनविभागाचे वनरक्षक राठोड, कर्मचारी बसवंत बिराजदार यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी महादेव कारभारी, गुरुनाथ भुसाप्पा, जीवन तोरकडे, किशोर होनाजे, धनराज गुंजोटे, उपस्थित होते.