शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'तेरणा'बाबत ३१ जानेवारीपूर्वी निर्णय घ्या; डीआरटी कोर्टाला औरंगाबाद हायकोर्टाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 14:29 IST

अडथळ्यांची शर्यत पार करीत तेरणा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठीची परवानगी मिळविण्यात जिल्हा बँकेला यश आले.

उस्मानाबाद : तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना निविदा प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल प्रकरणात कर्ज वसुली न्यायाधिकरण (डीआरटी) कोर्टाने ३१ जानेवारीपूर्वी निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. 

अडथळ्यांची शर्यत पार करीत तेरणा शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठीची परवानगी मिळविण्यात जिल्हा बँकेला यश आले. यानंतर निविदा काढण्यात आली. सुरुवातीच्या काही फेऱ्यात काही संस्थांनी निविदा घेतल्या. परंतु भरल्या नाहीत. दर कमी केल्यानंतर सोनारी येथील भैरवनाथ शुगरसह ट्वेन्टी वन शुगरने सहभाग घेतला. परंतु, निविदा विहित वेळेत न आल्याचे कारण देत बँकेने ट्वेन्टी वनची निविदा स्वीकारली नाही. बँकेच्या विरोधात ट्वेन्टी वनने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. 

खंडपीठात या प्रकरणी सुनावणीअंती त्यांना डीआरटी कोर्टात जाण्यास सांगितले होते. त्यानुसार ट्वेन्टी वनने डीआरटी कोर्टात धाव घेतली. १५ जानेवारीपर्यंत बँकेने कोणतीही कार्यवाही करू नये, असे आदेश दिले. या आदेशाला भैरवनाथ शुगरने औरंगाबाद हायकोर्टात आव्हान दिले. सोमवारी सुनावणी झाली असता, ३१ जानेवारीपूर्वी भैरवनाथ शुगर आणि ट्वेन्टी वन शुगर यांच्यातील प्रकरण निकाली काढावेत, असे आदेश दिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठAurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबाद