शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

लसीकरणासाठी सावरगावात ग्रामस्थांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी २०० कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले होते. दुसरा डोस मिळविण्यासाठी दवाखान्याबाहेर ...

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी २०० कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले होते. दुसरा डोस मिळविण्यासाठी दवाखान्याबाहेर ज्येष्ठ नागरिकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ४५ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे जवळपास ५०० ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच आपल्या घरी परतावे लागले.

मार्च महिन्यापासून सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. एप्रिल महिन्यात लसीकरणाला गती मिळाली. लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने लस टोचून घेण्यासाठी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करीत आहेत.

बुधवारी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २०० कोरोनाचे डोस प्राप्त झाले. त्यासाठी ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे नियोजनाचा फज्जा उडाला. अचानक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी ४५ दिवस पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याने सहा तास ताटकळत उभारलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागले. सकाळी दहा वाजता गर्दी पांगविण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांना पाचारण केले. सपोनि सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांनी कर्मचाऱ्यासह दवाखान्यास भेट देऊन गर्दी पांगविली. उपलब्ध लसीचा डोस टोचण्यासाठी डॉ. स्नेहा मोटे, डॉ. स्नेहल क्षीरसागर, डॉ. स्नेहा शिंदे, औषध निर्माता संदीप जगताप, भिंगारे, ठाकर, भालशंकर, आरोग्य पर्यवेक्षिका शोभा आदलिगे, आदी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

(चौकट)

दोन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त

सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकट काळात रुग्णसेवा बजावून कोरोना लसीकरण करणाऱ्या डॉ. स्नेहा मोटे, डॉ. स्नेहल क्षीरसागर या दोन महिला डॉक्टरांची सेवा समाप्तीचा निर्णय आरोग्य विभागाने घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले. मंगळवारी डॉ. माशाळकर व डॉ. कराळे यांची नियुक्ती केल्याचा आदेश धडकला आहे. संकट काळात सेवा देणाऱ्या महिला डॉक्टरांची सेवाच समाप्त केल्याने सावरगाव भागातील ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.