शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
3
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
4
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
5
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

अतिवृष्टीमुळे पीक वाया गेले; गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 6:49 PM

पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली.

तामलवाडी (जि. उस्मानाबाद) : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन एकरातील साेयाबीन पीक वाया गेले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, या विवंचनेतून तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील ५४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

वडागाव काटी येथील नवनाथ नरहरी धावणे यांना तीन एकर जमीन आहे. चार पैसे हाती पडावेत, यासाठी त्यांनी खरीप हंगामात संपूर्ण क्षेत्रात साेयाबीनचे पीक घेतले. पीकही जाेमदार आले हाेते. हे पीक काढणीला आले असताना सप्टेंबर व ऑक्टाेबरमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली. या पावसामुळे साेयाबीन पीक पाण्याखाली गेले. हाताताेंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा,? या विवंचनेत ते हाेते. यातूनच त्यांनी मंगळवारी सकाळी शेतातील गाेठ्यासमाेर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. देवानंद पंडित धावणे (रा. वडगाव काटी) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पाेलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादfarmer suicideशेतकरी आत्महत्या