शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : उन्हाळ्यात उष्माघाताने दरवर्षी जिल्हाभरात आठ ते दहा जणांचे बळी जातात. यावर्षी मात्र उष्माघाताने नागरिकांचा बळी नाही. कोरोनाच्या ...

उस्मानाबाद : उन्हाळ्यात उष्माघाताने दरवर्षी जिल्हाभरात आठ ते दहा जणांचे बळी जातात. यावर्षी मात्र उष्माघाताने नागरिकांचा बळी नाही. कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

कोरोनामुळे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. शिवाय लग्नसमारंभावरही निर्बंध असल्याने मोजक्याच नागरिकांमध्ये आटोपले जात आहेत. जिल्हाबंदी असल्याने लांबचा प्रवासही बंद आहे. अशा स्थितीत नागरिकांचा उन्हाळा घरीच जात आहे. त्यामुळे उष्माघाताची एकही घटना आजपर्यंत जिल्ह्यात घडली नाही. ग्रामीण भागात मशागतीची कामे सुरू आहेत. रोजगार हमीचीही कामे सुरू आहेत. त्यामुळे या नागरिकांना उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य विभागाने यामध्ये जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ढगाळ वातावरण

रोहिणी नक्षत्रापासून नवतपांना सुरुवात होते. यावर्षी रोहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरुवात होत आहे. नवतपा ३ जूनपर्यंत चालणार आहेत. या कालावधीत सूर्य-पृथ्वीदरम्यानचे अंतर कमी होते. त्यामुळे सूर्याची प्रखरता वाढते. तापमानाचा पारा ४४ अंशाच्या जवळपास पोहोचते. नवतपाच्या पूर्वीही असह्य उकाडा राहतो. मात्र, या वर्षी ढगाळ वातावरण असून, अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे तापमान घट होत आहे.

उन्हाळा घरातच

यंदा मार्च महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. कोरोना संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून निर्बंध लागू करण्यात आले. एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू आहे. शिवाय अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांचा उन्हाळा घरातच जात आहे.

कोट

दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी रुग्णालयात उष्माघातासंबंधी जनजागृती केली जात असत. शिवाय रुग्णांसाठी बेडही ठेवले जात. यंदा कोरोनामुळे सूचना फलक लावण्यात आले नाहीत. शिवाय अद्यापपर्यंत उष्माघाताचा रुग्ण आढळून आला नाही.

-डाॅ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी,

उष्माघाताचे बळी

२०१९ - १-

२०२० - ०८

२०२१ - ००