शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

वांझोटे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही; कृषी मंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 4:58 PM

कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. असा दिलासा दिला

ठळक मुद्देपिकाच्या उगवणक्षमतेसंदर्भात यंदा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. बियाणं वांझोट ठरल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेली आहे

कळंब (जि. उस्मानाबाद) : मामा... तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. महाबीज असो की अन्य कंपनी. चौकशीत जे कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार, असा कडक इशारा देत वांझोट्या बियाणामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी दिलासा दिला.

कळंब तालुक्यातील प्रमूख पीक हे सोयाबीन आहे. अशा या पिकाच्या उगवणक्षमतेसंदर्भात यंदा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. बियाणं वांझोट ठरल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेली आहे, शिवाय वेळ व पैसा याचाही अपव्यय झाला आहे. नुकसानीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यास्थितीत सोमवारी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी तालुक्यातील बागंरवाडी गावाचा दौरा केला. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात गंभीर तक्रारी समोर येत असलेल्या बांगरवाडी येथील चांगदेव रघुनाथ बांगर या शेतकऱ्याच्या शेताची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली. 

यावेळी आपल्या ६० गुंठे क्षेत्रात उगवण न झाल्याने नुकसान झाल्याचे तर गावातील इतर शेतकऱ्यांनीही गाव शिवारातील ५० टक्के क्षेत्रावर पेरणी फिरल्याने दुबार पेरणीचे संकट उभं ठाकल्याची व्यथा मांडली. यावेळी कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. यात महाबीज असो की अन्य कोणती कंपनी, जो कोणी दोषी आहे, त्यावर कारवाई होईलच असा ईशारा देत आश्वस्त केलं.

मंत्री थेट काळ्या वावरात...सोयाबीनच्या कोठारात सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात तक्रारी समोर येत आहेत. यात केवळ पेरणीचा हिशोब पकडला तर एकरी साडेपाच हजाराला शेतकरी खपला जात आहे. ही बाब ‘लोकमत’ सलग तीन दिवसांपासून मांडत आहे. दरम्यान, आज या गंभीर विषयाचे गांभीर्य लक्षात राज्याचे कृषि मंत्री दादाजी भूसे हे बांगरवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या काळ्या वावरात उतरले. याठिकाणी त्यांनी जमिनीत बिजारोपण केलेल्या व अद्याप बिंजाकूर न झालेल्या बियाण्याची पाहणी केली. कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, खासदार, आमदार, स्थानीक शेतकरी व संबंधीत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. याबद्दल समाधान व्यक्त केले जात होते.

टॅग्स :agricultureशेतीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी