काेराेनामुळे जंतनाशक गाेळ्या वाटप ठप्प, बालकांमध्ये जंतदाेष बळावला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST2021-09-12T04:37:07+5:302021-09-12T04:37:07+5:30
उस्मानाबाद : मागील दाेन वर्षांपासून काेराेना पाठ साेडण्याचे नाव घेत नाही. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी धाेका ...

काेराेनामुळे जंतनाशक गाेळ्या वाटप ठप्प, बालकांमध्ये जंतदाेष बळावला?
उस्मानाबाद : मागील दाेन वर्षांपासून काेराेना पाठ साेडण्याचे नाव घेत नाही. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी धाेका टळलेला नाही. या संकटाचा फटका अंगणवाडी, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या जंतनाशक गाेळ्या वाटप माेहिमेस बसला आहे. दर सहा महिन्यांनी घेण्यात येणारी माेहीम वर्षभरापासून झालेली नाही. परिणामी, बालकांतील जंतदाेष बळावल्याचे आराेग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. उघड्यावर शाैचास जाणे, हात स्वच्छ न धुण्यात आल्याने खासकरून बालकांमध्ये जंतदाेष आढळून येताे. वेळीच उपचार न केल्यास पुढे रक्तक्षय, अपचन, संडास, उलटीची त्रास हाेताे. यातून कुपाेषण डाेके वर काढते. परिणामी, मुलांची एकाग्रता कमी हाेते. त्यामुळे हा आजारच हाेऊ नये, म्हणून आराेग्य विभागाच्या वतीने शाळा, तसेच अंगणवाडीतील बालकांना जंतनाशक गाेळ्या दिल्या जातात. दर सहा महिन्यांनी ही माेहीम घेणे बंधनकारक आहे, परंतु काेराेनामुळे वर्षभराचा कालावधी लाेटूनही माेहीम झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बालकांमध्ये जंतदाेष बळावला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
काय आहे जंतदाेष?
जंतदाेष हा सर्वसाधारण आजार वाटत असला, तरी त्याच्यावर वेळीच उपचार न केल्यास पुढे बालकांना गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागताे. अनेक वेळा संबंधित बालक कुपाेषणाच्या विळख्यात सापडते. त्यामुळे वेळीच उपचाराची गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
२१ सप्टेंबर पासून माेहीम...
जागतिक आराेग्य संघटनेच्या सूचनेनुसार, जिल्ह्यात जंतनाशक गाेळ्या वाटप माेहीम २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासाठी १ ते ६, ६ ते १० आणि १० ते १९ असे तीन वयाेगट तयार करण्यात आले आहेत. उपराेक्त वयाेगटातील मुलांना आराेग्य कर्मचारी, शिक्षक व आशा कार्यकर्तींच्या माध्यमातून गाेळ्या दिल्या जातील.
गाेळ्यांसाठी काेणाकडे संपर्क करावा?
एकही बालक गाेळ्यांपासून वंचित राहू नये, यासाठी आराेग्य विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे गाेळ्यांसाठी पालकांनी वा नातेवाइकांनी गावातील शाळेवरील शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी अथवा आराेग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास गाेळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
काेट...
जागतिक आराेग्य संघटनेच्या अंदाजानुसार, २८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष असताे. हा दाेष नाहिसा करण्यासाठीच जंतनाशक गाेळ्या वाटपाची माेहीम राबविण्यात येते. आपल्याकडे २१ सप्टेंबरपासून ही माेहीम सुरू हाेईल. त्याचे नियाेजन करण्यात आले आहे.
-डाॅ.कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी.
स्वच्छतागृहाचा हवा नियमित वापर
बालकांमध्ये जंतदाेष बळावण्यास अनेक घटक कारणीभूत ठरतात. यापैकी प्रमुख कारण म्हणजे, उघड्यावर शाैचास जाणे. आजही ग्रामीण भागात शाैचालयाची बांधकामे झाली असली, तरी त्याचा १०० टक्के वापर हाेत नाही. त्यामुळे प्रामुख्याने जंतदाेष निर्माण हाेताे. जंतदाेष टाळण्यासाठी वेळाेवेळी हात स्वच्छ धुतला पाहिजे, परंतु बाहेर पडल्यानंतर तशी साेय नसते. यातूनही जंतदाेष बळावण्याचा धाेका अधिक असताे.