शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

तर वर्षा बंगल्यावर गाय बांधू; अजित पवारांचे हल्लाबोल आंदोलनातून मुख्यमंत्र्यांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:27 IST

जगाचा पोशिंदा जगला तर देश जगेल; पण या सरकारला शेतकर्‍यांशी काहीच देणे-घेणे नाही. ते निव्वळ फसव्या घोषणा करतात. स्वत: मुख्यमंत्री सभागृहात आपण शेतकरी असल्याचे सांगतात. असे असेल तर वर्षा बंगल्यावर गाय नेऊन बांधतो, त्यांनी दूध काढून दाखवावी, असे आव्हान अजित पवार यांनी आज भूम येथून दिले.

भूम ( उस्मानाबाद ) : जगाचा पोशिंदा जगला तर देश जगेल; पण या सरकारला शेतकर्‍यांशी काहीच देणे-घेणे नाही. ते निव्वळ फसव्या घोषणा करतात. स्वत: मुख्यमंत्री सभागृहात आपण शेतकरी असल्याचे सांगतात. असे असेल तर वर्षा बंगल्यावर गाय नेऊन बांधतो, त्यांनी दूध काढून दाखवावी, असे आव्हान अजित पवार यांनी आज भूम येथून दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूम (जि. उस्मानाबाद) येथे बुधवारी हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. मंचावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. राहुल मोटे, आ. राणाजगजितसिंह पाटील, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, अर्चना पाटील, वैशाली मोटे, तालुकाध्यक्ष हणमंत पाटुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टिका केली. 

येत्या निवडणुकीत सरकार हद्दपार कराकर्जमाफी, दुधाचा भाव, शेतीमालाचे हमीभाव, भारनियमन यांसह इतर सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना येत्या निवडणुकीत हद्दपार करा, असे आवाहन पवार यांनी केले. शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असतानाही सरकार शांत बसून आहे. शरद पवार कृषीमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. या सरकारने फसवी कर्जमाफी केली. शेती अडचणीत आली असताना पशुपालनाचा जोडधंदाही सरकारने अडचणीत आणला आहे. दुधाला भाव नाही. विचारल्यास दुग्धमंत्री अभ्यास चालू आहे असे सांगतात. असेच राहिले तर शेतकर्‍यांचे कसे होणार? अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली. सभेनंतर नेत्यांसह पदाधिकार्‍यांनी भूम येथील उपविभागीय अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देऊन सरकारला भावना कळविण्याची सूचना केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडे