शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नळदुर्ग किल्ल्यातील तलावात बोट उलटली; तीन मुलांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 15:15 IST

मृतांमध्ये एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे. 

नळदुर्ग (उस्मानाबाद ) : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील किल्ल्यात बोट उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू  झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. मृतांमध्ये एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी साधारपणे आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास जवळपास नऊ मुले-मुली किल्ला पाहण्यासाठी गेले होते. किल्ला पाहिल्यानंतर हे सर्वजण बोटींग करण्यासाठी गेले. नऊ मुले आणि एक मार्गदर्शक असे दहाजण बोटीमध्ये बसले. ही बोट पाण्यात काही अंतरावर गेली असता, एकजण बोटीच्या समोरच्या टोकाला धावत गेला. त्यामुळे बॅलन्स ढळल्याने बोट उलटली. हे सर्वजण बोटीखाली अडकल्याचे लक्षात येताच ‘युनिटी मल्टिकॉन्स’च्या बचाव पथकाने धाव घेतली. 

पथकाने बोटीखाली अडकडलेले सायमा शफिक जागीरदार (१५), अफशा शफिक जागीरदार (१३), बुशेरा शफिक जागीरदार (१०), अनस नौशाद पटेल (१३, सर्व रा. मुंब्रा, मुंबई), अलीझा एहसान काझी (६) व एहसान नय्यर काझी (वय ३६, दोघे रा. नळदुर्ग) या सहा जणांना वाचविण्यात यश आले. तर सानिया फारूक काझी (८), अलमास शफिक जागीरदार (१०) आणि इझहान एहसान काझी (५ तिघे रा. नळदुर्ग) या तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नळदुर्ग शहरावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूtourismपर्यटनOsmanabadउस्मानाबाद