शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

भाजपचे साखळी धरणे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 5:01 AM

उस्मानाबाद : भाजपच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी धरणे आंदोलन कोरोनाचा प्रार्दुभाव व या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या ...

उस्मानाबाद : भाजपच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी धरणे आंदोलन कोरोनाचा प्रार्दुभाव व या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे शनिवारपासून स्थगित करण्यात आले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील व भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, हे आंदोलन स्थगित केले असले, तरी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी या गंभीर व संवेदनशील विषयाबाबत तातडीने सर्व संबंधितांची बैठक घ्यावी. तसेच शेतकऱ्यांची ही कैफियत मुख्यमत्र्यांपर्यंत पोहोचवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून न्याय द्यावा. अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या तीव्र आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी शेतकऱ्यांसह या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना भेटण्याचा तसेच त्यांनी पीक विम्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत केली जाणार आहे.

शनिवारी आंदोलनाच्या सहाव्यादिवशी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस नितीन भोसले, आदम शेख, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, भटक्या विमुक्त सेल जिल्हाध्यक्ष सीताराम वनवे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, निशिकांत पाटील, दत्ता राजमाने, अमोल पाटील, प्रवीण सलगर, संतोश कस्पटे, किशोर पवार, रामेश्वर शेटे, संतोष सुपेकर, व्यंकट बंडगर, विजय सरडे, प्रवीण चैगुले, नवनाथ मुळे आदी उपस्थित होते.