शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

‘महाविद्यालयास अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्या’ तुळजापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ...

‘महाविद्यालयास अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्या’

तुळजापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे, अशी मागणी व्हीकेग्रुप एक नवा विचार मंच यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष विजय क्षीरसागर, सचिव आकश शिंदे, गणेश कसबे, गोविंद कसबे, उमेश कांबळे, धीरज कांबळे, संजय पारधे, महावीर क्षिरसागर, निखिल सिद्धगणेश यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मार्गदर्शक सूचनापत्रिकांचे वाटप

वाशी : तालुक्यातील पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बर्ड फ्लू रोग प्रादुर्भाव व प्रसाराबाबत मार्गदर्शक सूचनांच्या पत्रिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धनचे उपायुक्त पसरटे, पशुसंवर्धनचे जिल्हा आरोग्य अधिकारी आघाव, तालुका पशुसंवर्धन अधिकारी आलमवार, कुलकर्णी, प्रा. डॉ. विश्वास चौधरी व पोल्ट्री उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

प्रजासत्ताकदिनी १४४ कलम लागू

उस्मानाबाद : प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम होणार असल्याने या अनुषंगाने शहरातील श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते सर्कीट हाऊसपर्यंत २५ जानेवारी रोजी रात्री १२ ते २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

अधिकाऱ्यांत विसंवाद; कामगारांना होतोय त्रास

उस्मानाबाद : नगरपालिका व बांधकाम कामगार नोंदणी कार्यालय येथील कार्यालयीन अधिकाऱ्यांमधील विसंवादामुळे कामगारांना त्रास होत असून, तो थांबवावा. तसेच प्रमाणपत्रावर शिक्का देण्यासाठी दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी भीम निर्णायक युवा संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन दिलपाक, जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड, युवा कामगार आघाडीचे विष्णू कांबळे उपस्थित होते. बांधकाम नोंदणी ऑनलाईन झाल्यापासून कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

तुळजापूर : लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे व विशाल लोंढे यांनी अनुकंपाधारक नियुक्तीच्या अनुषंगाने वारंवार नगरपरिषद कार्यालयात येऊन पी. पी. बरूरकर व दत्ता साळुंके यांना धमकी देवून शासकीय कामात अडथळा केल्याचा आरोप करीत येथील पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. यामुळे दिवसभर पालिकेचे कामकाज बंद राहिले. या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली.

किशोर-किशोरी हितगुज बैठक

वाशी : जाणीव संघटनेच्या वतीने झिन्नर येथील महात्मा बसेश्वर विद्यालयात किशोर-किशोरी हितगुज बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी मुख्याध्यापक कावळे होते. यावेळी नेतृत्व, कौशल्य, वक्तृत्व कौशल्य, कलागुणांत वाढ व्हावी, यासाठी जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे यांनी मार्गदर्शन केले. किशोरवयीन मुला-मुलींना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाय यावरही माहिती दिली. नवनाथ मोरे यांनी आभार मानले.

बालिका, मतदान दिनानिमित्त कार्यक्रम

उस्मानाबाद : येथील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणतर्फे बालिका दिन व मतदान दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आले. हा कार्यक्रम समर्थ नगरमधील इंदिरा गांधी नर्सिंग महाविद्यालयात घेण्यात आला. यावेळी प्राधिकरणाचे सचिव एस. बी. तोडकर, ॲड. वैशाली धावणे, ॲड. डी. एस. जहागीरदार, ॲड. एम. बी. माढेकर विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. छत्रपाल वाघमारे यांनी आभार मानले.

सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

उस्मानाबाद : येथील के. टी. पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व के. टी. पाटील वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. अजित मसलेकर, प्रा. पराग कुलकर्णी, प्रा. शीतलनाथ एखंडे , प्रा. कल्पना वराळे, प्रा. एस. एस. पाटील, वरिष्ठ लिपिक विनोद बनसोडे, अजय शिराळ, ग्रंथपाल जाधव आदी उपस्थित होते.

ठाकरे, बोस यांना अभिवादन

उस्मनाबाद : येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिरात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे, किसन हजारे, आदर्श पवार, संजय जाधव, सुजित वाडकर, रमेश वागदकर, चित्रा सोनटक्के, मैना माळी, संगीता बलसुरे आदी उपस्थित होते.

रस्त्याची दुरवस्था

उस्मानाबाद : शहरातील देशपांडे स्टँडपासून नेहरू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अगदी उतारालाच रस्त्यावर खड्डे पडले असून, यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

तारांना झोळ

मुरुम : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये झोळ पडल्याचे दिसत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महावितरणने याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

वाहतुकीची कोंडी

कळंब : शहरात सध्या मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्य चौकासह रहदारीच्या मार्गावर ही जनावरे ठिय्या मांडत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, पालिका प्रशासनाने या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

पथदिवे बंद

नळदुर्ग :शहरातील काही भागातील पथदिवे सातत्याने बंद राहत आहेत. यामुळे नागरिकांची रात्रीच्या वेळी गैरसोय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सर्व दिवे सुरू करावेत, अशी मागणी शहरवासियांमधून केली जात आहे.

‘सुरळीत वीज द्या’

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी भागात शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.