जुन्या वादातून कंबरपट्ट्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:52+5:302021-07-07T04:40:52+5:30
उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून चाैघांनी संगनमत करून दाेघांना कंबरपट्ट्याने बेदम मारहाण केली. ही घटना पळसप येथे ४ जुलै ...

जुन्या वादातून कंबरपट्ट्याने मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून चाैघांनी संगनमत करून दाेघांना कंबरपट्ट्याने बेदम मारहाण केली. ही घटना पळसप येथे ४ जुलै राेजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ढाेकी पाेलीस ठाण्यात ५ जुलै राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पळसप येथील चंद्रसेन सुदामा कांबळे हे ४ जुलै राेजी साडेसात वाजण्याच्या सुमारास नातेवाईक कुमार व प्रमाेद नागनाथ गायकवाड या भावांसह आपल्या घरासमाेर उभे हाेते. यावेळी गावातीलच मंगल, संजय रमेश कांबळे, अर्जुन व भीमा बब्रुवान सूर्यवंशी यांनी जुन्या वादातून शिवीगाळ केली. यानंतर, कंबरपट्टा, दगडाने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चंद्रसेन कांबळे यांनी ५ जुलै राेजी ढाेकी पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.