शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

बळीराजाची व्यथा संपेना; पेरलेलं उगवलं नाही, गळफास लावून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:52 IST

शेतकऱ्याने नैराश्यातून आपल्याच शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

ढाेकी (जि. उस्मानाबाद) -खरीप हंगामात पेरणी केली. परंतु, पावसाअभावी पेरलेलं उगवलंच नाही. यातून आलेल्या नैराश्यातून एका ४६ वर्षीय शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना ४ जुलैच्या पहाटे साडेपाच वाजता उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा शिवारात घडली.

तावरजखेडा येथील शेतकरी संजय शामराव फेरे (४६)यांनी मागील आठवड्यात स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, यानंतर पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरलेलं बियाणं उगवलं नाही. यातून आलेल्या नैराश्यातून संजय फेरे यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडाला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना साेमवारी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी विशाल श्रीकृष्ण फेरे यांनी दिलेल्या माहितीवरून ढाेकी पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. पुढील तपास बिट अंमलदार संजीवन जाधवर हे करीत आहेत. मयत संजय फेरे यांच्या पश्चात पत्नी, एक अंध मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

बॅंकेचे ८५ हजारांचे कर्जमयत संजय फेरे यांच्या मालकीच्या जमिनीवर काेंड येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे ८५ हजारांचे कर्ज आहे. आर्थिक संकटातून मार्ग काढत त्यांनी जवळपास अडीच एकर क्षेत्रावर साेयाबीनची पेरणी केली. मात्र, पावसाअभावी बियाणाची उगवण झाली नाही. जवळचे पैसे गेले अन् बियाणेही उगवले नाही. त्यामुळे बॅंकेच्या कर्जाची परतफेड करायची कशी? या विवंचनेतून त्यांनी असे टाेकाचे पाऊल उचलले, असे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :agricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्याOsmanabadउस्मानाबाद