शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या एका निर्णयाने खेडोपाड्यातील मागासवर्गीय विद्यार्थिनींची थांबणार पायपीट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 18:29 IST

पुनर्नियोजनात २७ लाखांची तरतूद 

ठळक मुद्देसायकलींचे वाटप करण्याचा घेतला निर्णय 

उस्मानाबाद : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीय शेतकऱ्यांना पाईप पुरविण्याची योजना हाती घेण्यात आली होती. परंतु, कृषीसोबतच अन्य विभागांकडूनही पाईप पुरविण्यात येतात. त्यामुळे हा निधी मागासवर्गीय विद्यार्थिनींना सायकल वाटपासाठी वळविण्याचा निर्णय गुरूवारी विषय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुनर्नियोजनातून २७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना एका गावातून दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी शिक्षण विभागाकडून सायकलींचे वाटप केले जात होते. त्यामुळे शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थिनींना खाजगी वाहने अथवा बसेसची प्रतीक्षा करावी लागत नव्हती. शाळेच्या वेळेत वाहनांची सोय नसलेल्या मुलींनाही पायपीट करावी लागत नसे. परंतु, काही वर्षापूर्वी संबंधित विभागाने सायकलींच्या वाटपाची योजनाच गुंडाळली. सध्या कुठल्याही विभागाकडून सायकलींचे वाटप केले जात नाही. दरम्यान, सायकल वाटपाची योजना पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक पालकांतून होत होती. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेतील समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे यांनी गुरूवारी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत हा मुद्दा मांडला.

समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय शेतकऱ्या ंना पाईप पुरवठा करण्यात येत आहेत. परंतु, कृषीसोबतच इतर योजनांतूनही अशा प्रकारचे पाईप दिले जात आहेत. त्यामुळे समाजकल्याणकडील ही योजना बंद करून त्यासाठीचा २७ लाखांचा निधी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यासाठी ठेवावा, असे सांगितले. त्यास सर्वच सदस्यांनी सहमती दिली. त्यामुळे वाहतुकीच्या साधनांअभावी शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थिनींची होणारी पायपीट आता दूर होणार आहे. 

दप्तर, वह्यांसाठी ७ लाख रूपयेग्रामीण भागातील अनेक मागासवर्गीय कुटुंबांची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे ते आपल्या मुलासाठी वेळेवर दप्तर व वह्या खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातील निधीच्या पुनर्नियोजनातून सात लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या रक्कमेतून पात्र विद्यार्थ्यांना उपरोक्त साहित्य पुरविले जाणार आहे. हाही निर्णय विषय समितीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाची योजना हाती घ्यावी, अशी मागणी अनेक पालक माझ्याकडे करीत होते. त्यामुळे सेस फंडाच्या पुनर्नियोजनातून विद्यार्थिनींना सायकलींच्या वाटपासाठी २७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचे वाटप करण्यासाठी ७ लाख रूपये ठेवले आहेत. गरज भासल्यास आणखी तरतूद वाढविली जाईल.- दिग्विजय शिंदे, सभापती, जिल्हा परिषद.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाOsmanabadउस्मानाबाद