शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

आदित्य ठाकरे म्हणाले, मक्याचं लोणचं आणलंय, पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 22:42 IST

दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला.

उस्मानाबाद : दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला. या दौ-यात त्यांनी आपण शहरी भागातले असल्याने शेतीतील फारसे कळत नाही, मात्र तुम्हाला होणा-या त्रासाची जाणीव आहे, असे सांगत पशुधनासाठी मक्याचं लोणचं आणल्याचे सांगितले. हा शब्द नव्यानेच ऐकलेल्या शेतक-यांची उत्सुकता ताणली गेली अन् त्यांनी हे लोणचं पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या लोणच्याला उस्मानाबाद भागात मुरघास नावाने ओळखतात.आदित्य ठाकरे यांनी सेनेच्या पदाधिका-यांसह उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, समुद्राळ तर लोहारा तालुक्यातील जेवळी गावांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. दुपारी तीनच्या सुमारास नारंगवाडी येथे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या तवीने गावात बसविलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी नागरिकांनी त्यांच्या कानावर पाणीटंचाईची दाहकता टाकली. हा प्रश्न शिवसेना सोडवेल असे आश्वासन त्यांनी दिले. समुद्राळ येथील दुष्काळी दाहकता त्यांनी शेतक-यांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांनी आता निवडणुका तोंडावर आल्या म्हणून आलो नसल्याचे सांगत निवडणुकीत येऊ व निवडणुकीनंतरही, असे म्हणाले. संकटसमयी सेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. जेवळी येथे नागरिकांशी संवाद साधून संकटसमयी बरे वाईट विचार येतात, तेव्हा आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका, शिवसेना मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. संवाद साधल्यानंतर पशुधनासाठी आणलेले पशुखाद्य वितरीत करण्यात आले.महिलांनी सांगितली दाहकतानागरिकांशाी संवाद साधताना महिला तळमळीने दाहकता मांडत होत्या. रोजगार बुडवून पाण्यासाठी थांबावे लागत आहे. हे आम्हाला परवडणारे नाही. आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, पशुधनासाठी खाद्य द्या, अशी विनवणी करण्यात महिला आघाडीवर दिसल्या.असे बनते मक्याचे लोणचेआदित्य यांनी आणलेल्या मक्याच्या लोणच्याला आपल्याकडे मुरघास संबोधले जाते. मका फुलो-यात असताना तोडून त्याचे एक इंचाचे तुकडे केले जातात. एक दिवस वाळवून ते मोठ्या हौदात किंवा प्लास्टिक बॅगमध्ये दबई करीत त्यातील हवा काढली जाते. आर्द्रता संपविली जाते. यानंतर त्यामध्ये मिनरल, क्षार व काही कल्चर मिसळून या मिक्स्चरमध्ये हवा जाणार नाही, अशा पद्धतीने ठेवले जाते. २१ किंवा ४२ दिवस हे मिक्स्चर तसेच ठेवून नंतर त्याचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. या प्रक्रियेला आंबवणे असेही म्हटले जाते. या मुरघासाची चव चांगली होऊन पशुधनास आवश्यक असणारे घटक उन्हाळ्यातही मिळतात. त्यामुळे दुग्धक्षमताही वाढते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे