शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आदित्य ठाकरे म्हणाले, मक्याचं लोणचं आणलंय, पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 22:42 IST

दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला.

उस्मानाबाद : दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला. या दौ-यात त्यांनी आपण शहरी भागातले असल्याने शेतीतील फारसे कळत नाही, मात्र तुम्हाला होणा-या त्रासाची जाणीव आहे, असे सांगत पशुधनासाठी मक्याचं लोणचं आणल्याचे सांगितले. हा शब्द नव्यानेच ऐकलेल्या शेतक-यांची उत्सुकता ताणली गेली अन् त्यांनी हे लोणचं पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या लोणच्याला उस्मानाबाद भागात मुरघास नावाने ओळखतात.आदित्य ठाकरे यांनी सेनेच्या पदाधिका-यांसह उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, समुद्राळ तर लोहारा तालुक्यातील जेवळी गावांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. दुपारी तीनच्या सुमारास नारंगवाडी येथे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या तवीने गावात बसविलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी नागरिकांनी त्यांच्या कानावर पाणीटंचाईची दाहकता टाकली. हा प्रश्न शिवसेना सोडवेल असे आश्वासन त्यांनी दिले. समुद्राळ येथील दुष्काळी दाहकता त्यांनी शेतक-यांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांनी आता निवडणुका तोंडावर आल्या म्हणून आलो नसल्याचे सांगत निवडणुकीत येऊ व निवडणुकीनंतरही, असे म्हणाले. संकटसमयी सेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. जेवळी येथे नागरिकांशी संवाद साधून संकटसमयी बरे वाईट विचार येतात, तेव्हा आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका, शिवसेना मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. संवाद साधल्यानंतर पशुधनासाठी आणलेले पशुखाद्य वितरीत करण्यात आले.महिलांनी सांगितली दाहकतानागरिकांशाी संवाद साधताना महिला तळमळीने दाहकता मांडत होत्या. रोजगार बुडवून पाण्यासाठी थांबावे लागत आहे. हे आम्हाला परवडणारे नाही. आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, पशुधनासाठी खाद्य द्या, अशी विनवणी करण्यात महिला आघाडीवर दिसल्या.असे बनते मक्याचे लोणचेआदित्य यांनी आणलेल्या मक्याच्या लोणच्याला आपल्याकडे मुरघास संबोधले जाते. मका फुलो-यात असताना तोडून त्याचे एक इंचाचे तुकडे केले जातात. एक दिवस वाळवून ते मोठ्या हौदात किंवा प्लास्टिक बॅगमध्ये दबई करीत त्यातील हवा काढली जाते. आर्द्रता संपविली जाते. यानंतर त्यामध्ये मिनरल, क्षार व काही कल्चर मिसळून या मिक्स्चरमध्ये हवा जाणार नाही, अशा पद्धतीने ठेवले जाते. २१ किंवा ४२ दिवस हे मिक्स्चर तसेच ठेवून नंतर त्याचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. या प्रक्रियेला आंबवणे असेही म्हटले जाते. या मुरघासाची चव चांगली होऊन पशुधनास आवश्यक असणारे घटक उन्हाळ्यातही मिळतात. त्यामुळे दुग्धक्षमताही वाढते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे