शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

आदित्य ठाकरे म्हणाले, मक्याचं लोणचं आणलंय, पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 22:42 IST

दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला.

उस्मानाबाद : दुष्काळ पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी उमरगा-लोहारा मतदारसंघात दौरा झाला. या दौ-यात त्यांनी आपण शहरी भागातले असल्याने शेतीतील फारसे कळत नाही, मात्र तुम्हाला होणा-या त्रासाची जाणीव आहे, असे सांगत पशुधनासाठी मक्याचं लोणचं आणल्याचे सांगितले. हा शब्द नव्यानेच ऐकलेल्या शेतक-यांची उत्सुकता ताणली गेली अन् त्यांनी हे लोणचं पाहण्यासाठी एकच गर्दी केली. या लोणच्याला उस्मानाबाद भागात मुरघास नावाने ओळखतात.आदित्य ठाकरे यांनी सेनेच्या पदाधिका-यांसह उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, समुद्राळ तर लोहारा तालुक्यातील जेवळी गावांना भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. दुपारी तीनच्या सुमारास नारंगवाडी येथे आगमन झाल्यानंतर शिवसेनेच्या तवीने गावात बसविलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी नागरिकांनी त्यांच्या कानावर पाणीटंचाईची दाहकता टाकली. हा प्रश्न शिवसेना सोडवेल असे आश्वासन त्यांनी दिले. समुद्राळ येथील दुष्काळी दाहकता त्यांनी शेतक-यांकडून जाणून घेतली. यावेळी त्यांनी आता निवडणुका तोंडावर आल्या म्हणून आलो नसल्याचे सांगत निवडणुकीत येऊ व निवडणुकीनंतरही, असे म्हणाले. संकटसमयी सेना आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही दिली. जेवळी येथे नागरिकांशी संवाद साधून संकटसमयी बरे वाईट विचार येतात, तेव्हा आत्महत्येसारखे पाऊल उचलू नका, शिवसेना मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. संवाद साधल्यानंतर पशुधनासाठी आणलेले पशुखाद्य वितरीत करण्यात आले.महिलांनी सांगितली दाहकतानागरिकांशाी संवाद साधताना महिला तळमळीने दाहकता मांडत होत्या. रोजगार बुडवून पाण्यासाठी थांबावे लागत आहे. हे आम्हाला परवडणारे नाही. आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा, पशुधनासाठी खाद्य द्या, अशी विनवणी करण्यात महिला आघाडीवर दिसल्या.असे बनते मक्याचे लोणचेआदित्य यांनी आणलेल्या मक्याच्या लोणच्याला आपल्याकडे मुरघास संबोधले जाते. मका फुलो-यात असताना तोडून त्याचे एक इंचाचे तुकडे केले जातात. एक दिवस वाळवून ते मोठ्या हौदात किंवा प्लास्टिक बॅगमध्ये दबई करीत त्यातील हवा काढली जाते. आर्द्रता संपविली जाते. यानंतर त्यामध्ये मिनरल, क्षार व काही कल्चर मिसळून या मिक्स्चरमध्ये हवा जाणार नाही, अशा पद्धतीने ठेवले जाते. २१ किंवा ४२ दिवस हे मिक्स्चर तसेच ठेवून नंतर त्याचा वापर पशुखाद्य म्हणून केला जातो. या प्रक्रियेला आंबवणे असेही म्हटले जाते. या मुरघासाची चव चांगली होऊन पशुधनास आवश्यक असणारे घटक उन्हाळ्यातही मिळतात. त्यामुळे दुग्धक्षमताही वाढते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे