शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रागाच्या भरात महिलेने आधी दोन बालकांना पाण्यात बुडवलं, नंतर स्वतःही जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:00 IST

घटनेच्या दहा दिवसांनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धाराशिव : आपल्या पावणेदोन वर्षीय मुलीस व ४ महिन्यांच्या मुलाला घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मातेने स्वत: गळफास घेतल्याची घटना घट्टेवाडी येथे २४ नोव्हेंबरला घडली. आकस्मिक मृत्यूची नोंद घेतल्यानंतर ३ डिसेंबर रोजी पतीने दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी रात्री मयत महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

तुळजापूर तालुक्यातील घट्टेवाडी येथील गणेश सुनील घट्टे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पत्नी राधिका घट्टे (२५) हिच्यासह ते घट्टेवाडी येथील घरात वास्तव्यास होते. त्यांना १ वर्ष ९ महिने वयाची श्रेया ही मुलगी व ४ वर्षे वयाचा श्रेयस मुलगा होता. सर्वजण एकत्र राहात असताना राधिका ही सतत चिडचिड करायची. ती रागीट व तापट स्वभावाची होती. घरातील कामांचा तसेच मुले सांभाळायचा त्रास होत होता. यामुळे रागाच्या भरात राधिका हिने तिच्या दोन्ही लेकरांना २४ नोव्हेंबर रोजी दुपारी घरातीलच बॅरलमधील पाण्यात बुडवून ठार मारले. यानंतर तिने स्वत:ही घरातच गळफास घेत जीवन संपवले. 

हा प्रकार सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आला. याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, ३ नोव्हेंबर रोजी गणेश घट्टे यांनी नळदुर्ग ठाण्यात मयत पत्नीविरूद्ध खुनाची तक्रार दिली. दोन्ही लेकरांना बुडवून मारून स्वत: आत्महत्या केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी तिच्यावर बीएनएस कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारी