५० टक्के रूग्ण बरे हाेऊन परले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST2021-05-01T04:31:35+5:302021-05-01T04:31:35+5:30

कळंब - तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्यात होणाऱ्या रूग्णसंख्येतील वृद्धी कायम असून संख्या दोन हजारापार गेली आहे. असे असले ...

50% of the patients recovered and returned home | ५० टक्के रूग्ण बरे हाेऊन परले घरी

५० टक्के रूग्ण बरे हाेऊन परले घरी

कळंब - तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्यात होणाऱ्या रूग्णसंख्येतील वृद्धी कायम असून संख्या दोन हजारापार गेली आहे. असे असले तरी यात एक हजारावर रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कळंब तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच मे ते डिसेंबर दरम्यान बाधितांची संख्या २ हजार १८४ झाली होती. यानंतर पुढील महिना दिड महिना स्थिरावलेला आकडा पुन्हा हळू-हळू वाढत गेला होता.

यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाने मार्च महिन्याचा दुसरा पंधरवडा व एप्रिल महिन्यात आपली व्याप्ती सर्वदूर करत सर्वाना गंभीर होण्यास भाग पाडले होते. यामुळे प्रशासनावर लॉकडाऊनसह आरोग्य व्यवस्थेची क्षमता वृद्धींगत करण्याची वेळ आली होती.

दपम्या, यासर्व स्थितीत एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा तर रूग्णसंख्येत उच्चांकी वाढ नोंदवणारा ठरला आहे. यातच गंभीर रूग्णांची संख्या वाढल्याने बेड, ऑक्सिजन असे नवे प्रश्न समोर उभे केले आहेत.

चौकट...

रूग्णसंख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर...

तालुक्यात दुसऱ्या टप्यात दरदिवशी रूग्णसंख्येत वाढ नोंदली गेली आहे. कोरोनाची व्याप्ती ही वाढतच चालली असून मागच्या आठवड्यात सत्तर गावात दस्तक दिलेला कोरोना आता बहुतांश गावात पोहचला आहे. यातून शहरातील रूग्णांची संख्या ६४४ तर ग्रामीन भागतील संख्या १ हजार ९०० च्या पुढे गेली आहे.

हजारावर रूग्ण सुखरूप घरी...

दुसऱ्या टप्प्यातील ८२५ रूग्ण सध्या उपचार घेत आहेत. यात ‘होम आयसोलेट’ रूग्णांचाही समावेश आहे. याशिवाय एकूण १ हजार ५७ रूग्ण कोरोनामुक्त होत सुखरूप घरात आहेत. यातील रूग्णालयातून उपचार घेत ‘बॅक टू होम’ झालेल्या बाधितांची संख्या ही मोठी आहे. एकूण कोरोनामुक्त झालेल्यात शहरातील ४४९ तर ग्रामीण भागातील ६१४ बाधितांचा समावेश आहे.

Web Title: 50% of the patients recovered and returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.