शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'राष्ट्रीय शिष्यवृत्ती' पटकावलेल्या ४१० विद्यार्थ्यांना २ वर्षांपासून एक छदामही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 18:12 IST

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीत राष्ट्रीय पातळीवर मुलांनी मेरिट पटकावले; शिष्यवृत्तीचा नाही पत्ता !

ठळक मुद्दे पात्र विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रूपये या प्रमाणे प्रतिवर्ष बारा हजार रूपये शिष्यवृत्ती मिळतेआठवीच्या वर्गातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.

उस्मानाबाद : आर्थिक मागास घटकांतील विद्यार्थ्यांतून प्रज्ञावान मुलांचा शोध घेऊन त्यांची प्रज्ञा जोपासली जावी,  त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण सुलभतेने पूर्ण व्हावे यासाठी आठवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक  दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. पात्र विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रूपये या प्रमाणे प्रतिवर्ष बारा हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित आहे. परंतु, मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील ४१० विद्यार्थ्यांना छदामही मिळालेला नाही, हे विशेष.

गुणवत्ता असूनही अनेकवेळा केवळ आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात. वेळप्रसंगी शिक्षणावर पाणी फेरले जाते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (एएमएमएस) सुरू केली आहे. आठवीच्या वर्गातील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. २०१७-१८ पूर्वी ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रूपये म्हणजेच प्रतिवर्ष ६ हजार रूपये दिले जात होते. परंतु, वाढत्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने केंद्र शासनाने शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ केली. आता प्रतिमहा १ हजार रूपये या प्रमाणे वर्षाकाठी संबंधित विद्यार्थ्यास १२ हजार रूपये मिळतात.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असता, २०३ जण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले होते. तर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात २०७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर प्रतिमहा १ हजार रूपये जमा होणे अपेक्षित होते. परंतु, सध्या तरी तसे होताना दिसत नाही. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीधारक झालेले विद्यार्थी दहावी परीक्षा देऊन बाहेर पडले. तरीही त्यांच्या खात्यावर मागील दोन वर्षात छदामही जमा झालेला नाही. अशीच अवस्था २०१८-१९ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आहे. त्यांनाही वर्षभरापासून शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे हे सर्व चित्र पाहता, योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसते. दरम्यान, यासंदर्भात पालक माध्यमिक शिक्षण विभागाकडे संपर्क साधत आहेत. परंतु, त्यांच्याही हातात काही नसल्याने ते वरिष्ठ कार्यालयाकडे बोट दाखवित आहेत. याबाबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसह पालकांतूनही तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

विद्यार्थी म्हणतात...मी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. अभ्यासातील सातत्यामुळे ही परीक्षा उत्तीरर्णच नव्हे, तर शिष्यवृत्तीधारक झाले. त्यामुळे प्रतिमहा १ हजार रूपये या प्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम मिळणे अपेक्षित होते. परंतु, दोन वर्षांपासून छदामही मिळालेला नाही.- स्रेहल पाटील, विद्यार्थिनी, उस्मानाबाद.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७-१८ मध्ये ‘एनएमएमएस’ परीक्षेत यश मिळविले. त्यामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण सुलभ होणार, म्हणून मी निर्धास्त होते. परंतु, घडले उलट. अद्याप शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही.      - मयुरी हजारे, विद्यार्थिनी, राघुचीवाडी.

टॅग्स :Studentविद्यार्थीOsmanabadउस्मानाबादSchoolशाळाScholarshipशिष्यवृत्तीCentral Governmentकेंद्र सरकार