शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:09 IST

पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

ठळक मुद्दे९७ प्रकल्पात मृतपाणीसाठा १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा ७४ प्रकल्प कोरडेठाक 

उस्मानाबाद : ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ यात १५० गावांसाठी २३० विंधन विहिरींची अधिग्रहणे आहेत़ १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ विशेषत: जिल्ह्यातील ६४ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले असून, तब्बल ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़

गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ शेतशिवारातील विहिरी, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत़ पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून विंधनविहिरी अधिग्रहण, टँकर सुरू केले जात आहेत़ सध्या जिल्ह्यातील १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ हे टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर दुसरीकडे तब्बल १५० गावांसाठी २३० विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़

उस्मानाबाद तालुक्यातील ७ गावांसाठी १४ टँकर, ५१ गावांसाठी ५८ अधिग्रहणे, तुळजापूर तालुक्यातील १९ गावांसाठी २५ अधिग्रहणे, उमरगा एका गावासाठी एक अधिग्रहण, लोहारा तालुक्यातील ११ गावासाठी १५ अधिग्रहणे, कळंब तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर, ३२ गावांसाठी ५६ अधिग्रहणे, भूम तालुक्यातील सहा गावांसाठी सहा टँकर, दोन गावांसाठी दोन अधिग्रहणे, वाशी तालुक्यातील ११ गावांसाठी ११ अधिग्रहणे, परंडा तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर व २३ गावांसाठी २७ अधिग्रहणे मंजूर करण्यात आली आहेत़

एकीकडे प्रशासन टंचाई निवारणार्थ प्रयत्न करीत आहे़ मात्र, दुसरीकडे प्रकल्पातील पाणीपातळीतही झपाट्याने घट होत आहे़ सध्या जिल्ह्यातील ६४ प्रकल्प कोरडेठाक असून, ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ ३७ प्रकल्पात २५ टक्क्यांहून कमी उपयुक्त पाणी आहे़ १८ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर सहा प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी आहे़ केवळ एका प्रकल्पात ७५ टक्क्यावर उपयुक्त पाणी आहे़

टँकर सुरू असलेली गावेउस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बा़), रूई (ढो़), नांदुर्गा, खामगाव येथे प्रत्येकी एक तर येडशी येथे सहा व बेंबळी येथे तीन टँकर सुरू आहेत़ कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव येथे प्रत्येकी एक, भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरूड, सावरगाव, वारंवडगाव कासारी प्रत्येकी एक तर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी येथे प्रत्येकी टँकर सुरू आहे़ या सर्व गावातील ५४ हजार ४६४ नागरिकांची टँकरद्वारे तहान भागविली जात आहे़

मोठ्या प्रकल्पांची स्थितीजिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या सिना-कोळेगाव प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात ६़५८ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे़ तर केज येथील मांजरा प्रकल्पात मृतपाणीसाठा आहे़

चार मध्यम प्रकल्प कोरडेठाकउस्मानाबाद तालुक्यातील रूईभर, परंडा तालुक्यातील खासापूर, चांदणी व साकत हे चार मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत़ तर उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, वाघोली, कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांची स्थितीही बिकट आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद