शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १५० गावांसाठी २३० अधिग्रहणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 19:09 IST

पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़

ठळक मुद्दे९७ प्रकल्पात मृतपाणीसाठा १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा ७४ प्रकल्प कोरडेठाक 

उस्मानाबाद : ग्रामीण भागात निर्माण झालेली पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तब्बल २५४ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ यात १५० गावांसाठी २३० विंधन विहिरींची अधिग्रहणे आहेत़ १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ विशेषत: जिल्ह्यातील ६४ प्रकल्प पूर्णत: कोरडेठाक पडले असून, तब्बल ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़

गतवर्षी अपुऱ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत़ शेतशिवारातील विहिरी, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे़ परिणामी दिवसेंदिवस पाणीटंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत़ पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून विंधनविहिरी अधिग्रहण, टँकर सुरू केले जात आहेत़ सध्या जिल्ह्यातील १७ गावांना २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ हे टँकर भरण्यासाठी २४ विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर दुसरीकडे तब्बल १५० गावांसाठी २३० विंधनविहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़

उस्मानाबाद तालुक्यातील ७ गावांसाठी १४ टँकर, ५१ गावांसाठी ५८ अधिग्रहणे, तुळजापूर तालुक्यातील १९ गावांसाठी २५ अधिग्रहणे, उमरगा एका गावासाठी एक अधिग्रहण, लोहारा तालुक्यातील ११ गावासाठी १५ अधिग्रहणे, कळंब तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर, ३२ गावांसाठी ५६ अधिग्रहणे, भूम तालुक्यातील सहा गावांसाठी सहा टँकर, दोन गावांसाठी दोन अधिग्रहणे, वाशी तालुक्यातील ११ गावांसाठी ११ अधिग्रहणे, परंडा तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर व २३ गावांसाठी २७ अधिग्रहणे मंजूर करण्यात आली आहेत़

एकीकडे प्रशासन टंचाई निवारणार्थ प्रयत्न करीत आहे़ मात्र, दुसरीकडे प्रकल्पातील पाणीपातळीतही झपाट्याने घट होत आहे़ सध्या जिल्ह्यातील ६४ प्रकल्प कोरडेठाक असून, ९७ प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ ३७ प्रकल्पात २५ टक्क्यांहून कमी उपयुक्त पाणी आहे़ १८ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर सहा प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणी आहे़ केवळ एका प्रकल्पात ७५ टक्क्यावर उपयुक्त पाणी आहे़

टँकर सुरू असलेली गावेउस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बा़), रूई (ढो़), नांदुर्गा, खामगाव येथे प्रत्येकी एक तर येडशी येथे सहा व बेंबळी येथे तीन टँकर सुरू आहेत़ कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव येथे प्रत्येकी एक, भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरूड, सावरगाव, वारंवडगाव कासारी प्रत्येकी एक तर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी येथे प्रत्येकी टँकर सुरू आहे़ या सर्व गावातील ५४ हजार ४६४ नागरिकांची टँकरद्वारे तहान भागविली जात आहे़

मोठ्या प्रकल्पांची स्थितीजिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या सिना-कोळेगाव प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात ६़५८ टक्के उपयुक्त पाणी उपलब्ध आहे़ तर केज येथील मांजरा प्रकल्पात मृतपाणीसाठा आहे़

चार मध्यम प्रकल्प कोरडेठाकउस्मानाबाद तालुक्यातील रूईभर, परंडा तालुक्यातील खासापूर, चांदणी व साकत हे चार मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत़ तर उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, वाघोली, कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांची स्थितीही बिकट आहे़

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीOsmanabadउस्मानाबाद